साक्ष फाउंडेशन तर्फे वकृत्व स्पर्धा व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावर मान्यवर.अध्यक्ष व फांउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
नागाव -रुपेश आठवले
-साक्ष फांउडेशनने स्थापनेपासून आजपर्यंत आपली दानशूर व्यक्तीमत्वाची तसेच शैक्षणिक व गरजू लोकांना, विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा आजतागायत जपली आहे. यावर्षी देखिल नागावर येथे सरपंच, सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या समवेत नागाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन्सील पाटी देऊन मदत केली आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात येथील आर्मी आँफीसर सर्जेराव मोहिते अध्यक्ष स्थानी होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना मोहिते म्हणाले की, साक्ष फाऊंडेशने समाजातील दूर्लक्षित, गरजू घटकांसाठी अतिशय चांगले काम करत असून, छोटीसी मदत देखिल समोरच्या व्यक्तीला माेठी वाटत असते. अशा संस्थेच्या कामासाठी माझे भविष्यात नेहमीच सहकार्य राहिल अशी ग्वाही देत, सेवाभावी सामाजिक संस्था ह्या समाजाच्या प्रश्नावर काम नेहमी काम करत असतात. त्या सातत्याने समाजाचा आधार बनत असतात असे माेहिते म्हणाले.
नागाव गावचे लोकनेते सरपंच विमल शिंदे म्हणाले की, समाजात असे अनेक उपेक्षित व्यक्ती, घटक आहेत. त्यांच्यापर्यंत मदत मिळणे महत्वाचे असते. साक्ष फाऊंडेशने हे आपले कार्य प्रामाणिक पणे पार पाडत आहे.या संस्थेला नेहमीच ग्रामपंचायत म्हणून व गावचे सहकार्य राहिल, असा विश्वास शिंदे यांनी दिला. या कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य संतोष पाथरे. दलित पॅंथरचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अवंतिका सावंत, मीनाक्षी स्वामी ,समाजसेवक अनिल शिंदे ,पंचशील मंडळाचे अध्यक्ष प्रवीण आठवले ,सचिन खांडेकर ,चंदन मछले ,अश्विनी भोसले ,वैष्णवी मछले इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
महात्मा गांधी जयंती निमित्त साक्ष फाउंडेशन तर्फे विद्या मंदिर नागाव तालुका हातकणंगले या ठिकाणी शालेय वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वकृत्व स्पर्धा ही घेण्यात आले. या आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला .
साक्ष फाउंडेशनच्या संस्थापक सेक्रेटरी स्वरांजली आठवले यांनी विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि पुरस्कार साहित्याचे वाटप केले. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी, गरजू लोकांना शिक्षण कामासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आपण व आपली सस्था प्रयत्नशील असेल अशी ग्वाही साक्ष फाऊंडेशनच्या वतीने स्ंस्थापक सेक्रेटरी स्वरांजली आठवले यांनी दिली.
- यावेळी संस्थेने जे कार्य हाती घेतेले आहे. त्याचे भरभरून काैतुक उपस्थितत मान्यवरांनी केले. सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र, उपजतच आवड आणि इच्छाशक्ती असल्यास नेहमीच सामाजिक कार्य उंचावते. ते जनमानसात उमटते. मदत करणाऱ्यांची फळी निर्माण होते. असे दलित पँथरचे हातगकणंगले तालुका अध्यक्ष अवंतिका सावंत यांनी सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी फाउंडेशनच्या सेक्रेटरी स्वरांजली आठवले यांचा सत्कार करत कार्याची कौतुक केले. सूत्रसंचालन पाटील सर प्रस्ताविक कुंभार सर यांनी तर स्वरांजली आठवले यांनी पाहुण्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला, विद्यार्थी, पालक , ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.