आदर्श पिढी घडविण्यासाठी सुसंस्कार महत्त्वाचे: युवासंत नितीनभाऊ मोरे
बंगळुरूत विद्यारंभ संस्कार सोहळा उत्सहात
नाशिक ( सुनील साळवी) : आदर्श पिढी घडविण्यासाठी सुसंस्कार महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ प्रकल्पाचे उपव्यवस्थापक, युवा संत गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी केले.
श्री स्वामी सेवामार्गाच्या बंगळुरू सेवाकेंद्रात देश-विदेश अभियानातर्फे विद्यारंभ संस्कार सोहळा आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन हे उपक्रम गुरुपुत्र श्री मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या आध्यात्मिक उपक्रमांना स्थानिक सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी श्री मोरे यांनी उपस्थितांना हिंदीतून संबोधित केले. ते म्हणाले की, सेवामार्गाचे सर्व अठरा विभाग हे जनकल्याणासाठी आहेत. त्यापैकी बालसंस्कार, शिशु संस्कार आणि गर्भसंस्कार व युवा प्रबोधन विभागाला परमपूज्य गुरुमाऊलींनी झुकते माप दिले आहे. कारण आदर्श, निर्व्यसनी आणि सुसंस्कारित पिढी घडवून वृद्धाश्रममुक्त भारत ही संकल्पना सर्वांच्या योगदानातून साकार करायची आहे. या पवित्र कार्यात सर्वांनी झोकून द्यावे असे आवाहन श्री मोरे यांनी केले.
स्थानिक सेवेकऱ्यांनी युवा संत श्री नितीनभाऊ यांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. बंगळूरु सेवाकेंद्र आणि देश-विदेश अभियानाच्या प्रतिनिधींनी या सत्संग कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. गुरुपुत्र श्री मोरे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक सेवेकरी अक्षरशः भारावून गेले. देश-विदेशात स्वामी कार्याची ध्वजा उंच फडकण्यासाठी सेवामार्गाचा ‘देश विदेश अभियान’ हा विभाग प्रयत्नशील आहे.