पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर ते मिरज लोकल रेल्वे सुरू करा अन्यथा आंदोलन करू…..
काेल्हापूरःकाेराेना नंतर काेल्हापूर- मिरज ही बहुउपयाेगी व प्रवाशांच्या दृष्टीने तसेच असंख्य कामगारांच्या साेयीची असलेली रेल्वे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दरराेज हजाराे प्रवाशांची गैरसाेय तसेच आर्थिकृष्ट्या हाल हाेत आहे. त्यामुळे ही लाेकल, पँसेजर रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरु करावी, या आशायाचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार यांच्यावतीने काेल्हापूर येथील रेल्वे प्रशासन तसेच स्टेशन मास्तर विजयकुमार यांना देण्यात आले.
काेेल्हापूर- मिरज लाेकल रेल्वे सुरु करा, दिले निवेदन.
निवेदनातील महत्वाचे मुद्दे असे
सध्या सर्व कामगारांना नोकरदारांना कोल्हापूर येथे कोल्हापूर ते मिरज पुन्हा रस्त्याच्या मार्गाने ये जा करावी लागत आहे. तसेच त्या ठिकाणी अनेक महिला कार्यरत असून रात्री अपरात्री कामावरून परतत असतात. त्यांनाही परतीच्या प्रवासासाठी अडचणी निर्माण होत आहेत. याकडेही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे .
या सर्व प्रकारामुळे कामगारांना रेल्वे व इतर वाहतुकीमुळे दोन वेळा खर्च करावा लागत आहे. कामगारांना नोकरदारांना वेतन, पगार कमी असल्याने त्यांना प्रापंचिक अडचणींचा सामना करावा लागतो.
सदर कामगारांची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी आठ ते रात्री आठ वाजता प्रमाणे कोल्हापूर ते मिरज लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी.अन्यथा गांधीनगर येथे 15 ऑगस्ट दिवशी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वे रोको करण्यात येईल.असे निवेदन सुरेश रमेश कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र सचिव बाळासो कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश आळतेकर कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष प्रवीण बनसोडे,मोहसीन पोवाळे,इरफान कुरणे, गोविंद पवार ,शुभम घाटगे ,विनोद हेगडे ,प्रशांत कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटना जिल्हा कोल्हापूरच्या वतीने साेमवारी संस्थापक अध्यक्ष अंजुम देसाई यांच्या आदेशाने . कोल्हापूर मधील स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांना हे निवेदन देण्यात आले. यामध्ये गांधीनगर येथे ये जा करणाऱ्या सर्व रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरु करावा. गांधीनगर येथे अनेक व्यवसायांची नांदी आहे. गांधीनगर मधील या सर्व व्यवसायाकडे कोल्हापूर, जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगले ,आळते ,इचलकरंजी, तसेच मिरज, सांगली या भागातून अनेक कामगार नोकरी व दैनंदिन कामाकरिता येतात. येण्याकरता मार्गावरून पूर्वीच्या गांधीनगर थांबा बंद केल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.