*ज्ञानार्जनाने रोजगार हेच एनएपीचे ध्येय: डॉ. नितीन जाधव
पिंपळगाव बसवंत : ज्ञान मिळवून त्यातून कौशल्य वाढवित उपजीवीकेसाठी रोजगाराभिमुख हेच ध्येय ठेवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनएपी) २०२० बनविले गेले आहे. जीवनाच्या भवसागरातून पोहून जाण्यासाठी अभ्यासक्रम हा दिपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक ठरणारा आहे. सोशल मिडीयामुळे विचलित होण्याचे असंख्य मार्ग उपलब्ध असतांना एकाग्र होत पुढे जाणे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी हवी.
दुसऱ्यांच्या अनुभवतातून देखील शिकता येते यामुळे अनुभवी व्यक्तींशी संवाद साधा, अपयशातूनच यशाचा मार्ग शोधता येतो असे प्रतिपादन मविप्रचे शिक्षणाधिकारी तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. नितीन जाधव यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात सात दिवसीय दिक्षारंभ समारंभाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदार्थ विज्ञान शाखा अभ्यास मंडळ सदस्य प्रा डॉ रमेश भिसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्ञानोबा प्रा डॉ नरेंद्र पाटील, प्रा भगवान कडलग, उपप्राचार्य दिलीप माळोदे, प्रा. हेमंत पाटील, प्रा किरणकुमार जोहरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. निशीगंधा जाधव, प्रा. हर्षल बोरस्ते, प्रा. भारती उगले, प्रा. राणी जगताप यांचा सेट परीक्षेतील प्राविण्याबद्दल तर प्रा. अमोल मेहंदळे, प्रा डॉ अक्षय धायगुडे, प्रा. बी. एन. कडलग यांना अस्पायर प्रोजेक्ट अंतर्गत एकूण सहा लाख ऐंशी हजार संशोधन निधी मंजूर झाल्याबद्दल मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी गौरव केला.
*विद्यार्थांना रोजगाराभिमुख बनविणे ही प्राध्यापकांची जबाबदारी: डॉ. रमेश भिसे*
एनएपी नुसार विद्यार्थांना त्यांच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी आता प्राध्यापकांच्या खांद्यावर आहे. विद्यार्थांना रोजगाराभिमुख बनविणे ही यापुढे प्रत्येक प्राध्यापकांची सामुहिक जबाबदारी आहे. लायक प्राध्यापकच यानंतर शिक्षण क्षेत्रात टिकतील. ज्ञानाचा वापर समाजासाठी करणाऱ्या प्राध्यापकांचा आदर्श विद्यार्थांनी बाळगावा. विद्यार्थांनी प्राध्यापकाला किती ज्ञान आहे आणि तो प्राध्यापक आपल्या ज्ञानाचा समाजासाठी नेमके काय उपयोग करतो हे पाहून त्याला आयडॉल बनवावे व तो शिकवत असलेला आवडणारा विषय निवडावा. जगासाठी उपयोगी न ठरता केवळ पोपटपंची करणारे शिक्षक लोक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २०२९ पर्यंत खड्यासारखे बाहेर फेकले जातील असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. रमेश भिसे यांनी केले. “करीयर घडवितांना एनएपी” याविषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यार्थांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. एनएपी चा आराखडा, श्रमप्रतिष्ठा, शारीरीक व मानसिक शिक्षणाचे महत्व देखील त्यांनी समजावून सांगितला.

कार्यक्रमाचे प्रास्थाविक डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. भगवान कडलग यांनी केले तर आभार डॉ. अनिल तिदार यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात दीक्षारंभ समारंभ प्रसंगी बोलताना म वि प्र शिक्षण अधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, व्यासपीठावर प्रा डॉ रमेश भिसे प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे, प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, उपप्राचार्य दिलीप माळोदे ,प्रा भगवान कडलग आदी