दाजीपूर अभयारण्यातील घडली…
राधानगरी – राधानगरी तालुक्यातील दाजीपूर पैकी वलवन येथील, विजय अर्जुन पाटील यांना ग वा रेड्याने मारल्याने गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दाजी पूर पैकी वळवण येथील विजय अर्जुन पाटील हे आपल्या शेळ्या घेऊन, शेतामध्ये गेला असता अचानक आलेल्या गवा रेड्यांनी विजय अर्जुन पाटील या शेतकऱ्यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे त्याच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत.
या भागात वरच्यावर गवारेड्याने मारल्याने शेतकरी जखमी होत आहेत. या रेड्यांचा वन खात्याने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी भागातील शेतकरी करत आहेत. वलवन येथील गरीब शेतकरी विजय अर्जुना पाटील या शेतकऱ्यास वन खात्याने तातडीने मदत देऊन उपचार करावा अशी मागणी वलवन सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील संदीप पाटील यांनी केले आहे.