कोल्हापूर येथील छत्रपती शाहू टरमीनल्स येथून सोमवारी सायंकाळी 4.20 ला वंदे भारत पुण्याकडे रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने यांच्यासह सत्यजित कदम, विजय जाधव, रूपाराणी निकम , राहुल चिकोडे, शिवनाथ बियानी व रेल्वेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 4.20 ला कोल्हापुरातून निघाली आणि
4.55 ला मिरजेत पोहचली.
कोल्हापूर मुंबई वंदे भारत ही रेल्वे देखील लवकरच सुरू होईल त्यासाठी आपले विशेष प्रयत्न राहतील असे केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री व्ही. सोमन्ना यांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले. खासदार धनंजय महाडीक यांनी कोल्हापूर मुंबई एक्सप्रेस सुरू करावी, तर खासदार शाहू महाराज कोल्हापूर बंगळुरू ही देखील रेल्वे सुरू करावी अशी मागणी व्ही. सोमन्ना यांच्याकडे केली. एकूण 530 क्षमता असलेल्या या वंदे भारत मधून शाळेतील मुले, व्हीआयपी, राजकीय व्यक्ती, पत्रकार, सोशल मीडिया च्या प्रतिनिधीनी मिरज तसेच पुण्यापर्यंत प्रवासाचा आनंद लुटला. अखेर तीन वर्षाची वंदे भारत च्या मागणीची प्रतिक्षा संपली. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. रेल्वेच्या सर्व पदाधिकारीवर्गाने सर्वांचे आत्मीयतेने स्वागत केले. यावेळी गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी रेल्वेचे पदाधिकारी प्रभातरंजन, व्ही, के सिंग, डॉ रामदास भिसे,विकास श्रीवास्तव, जयेश ओसवाल, शिवनाथ बियानी उपस्थित होते.
|