चला निसर्ग पाहूयाः भटकंती-रांगड्या मातीतली

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

तुम्हांला तर माहीतच आहे शाहूवाडी कोकणचे प्रवेशद्वार,२० हजार पेक्षा जास्त हेक्टर परीसरावर पसरलेला जंगली भाग हाच पर्यटनाचा मुख्य घटक.

ह्या वाटेचा थाट काय औरच,वेडीवाकडी वळणे,पावसात मातीचा सुटलेला गंध-डोळ्याचे पारणे फेडणारे मानोली धरण-खवय्यांची खवय्येगिरी पुरवणारी येथली सर्व रेस्टॉरंट -मानोली गणपती मंदीर.एक वेगळीच उर्जा व मनमुराद भटकंतीचा आनंद देणारा हा मार्ग.
आणी येथला पाऊस कसा….चिंब चींब भिजवणारा,कडे कपारींशी हितगुज करणारा,शौर्य वाटेवर-शौर्याच्या पावसात अंगात वीरश्री संचारणारा ,गवताच्या पात्यांवर दवबिंदु मधुन दिसणारा,नागमोडी वाटेवर-ओला चींब भिजवणारा,जोरदार सरीं मधून आग्या मव्हांसारखा आंगाला टोचणारा, रिमझीम सरी आणी वाफळलेला चहा नाद खुळाच.

आणी येथला पाऊस कसा….
चिंब चींब भिजवणारा,कडे कपारींशी हितगुज करणारा,शौर्य वाटेवर-शौर्याच्या पावसात अंगात वीरश्री संचारणारा ,गवताच्या पात्यांवर दवबिंदु मधुन दिसणारा,नागमोडी वाटेवर-ओला चींब भिजवणारा,जोरदार सरीं मधून आग्या मव्हांसारखा आंगाला टोचणारा, रिमझीम सरी आणी वाफळलेला चहा नाद खुळाच.

धोपेश्वर नयनरम्य परिसर शाहुवाडीच रांगड सौंदर्य

पुन्हा भेटू असच भटकंती मध्ये…….

रांगड्या मातीत….रांगड्या शाहूवाडीत

डॉ.झुंझार माने
स्वराज्य प्रतिष्ठान
युगंधर फिल्म प्रोडक्शन
शाहूवाडी

आज मी तुम्हांला अशाच एका भटकंती वाटेवरुन फिरवून आणतो.मलकापूर पासून उचत-माण ते चवथा मैल ते पांढरेपाणी-पावनखिंड-भाततळी-केंबुर्णेवाडी-वाघझरा-आंबा मार्ग म्हणजे रोमहर्षक इतिहास व निसर्गाच्या नयनमनोहर देखाव्याच दर्शन घडाविणारा मार्ग.चवथा मैलपासुनच सुरु होते गर्द हिरवीगार झाडी,झोंबाणारा वारा,माण पासून थोडे पुढे ऊजवीकडे ठाणेवाडी फाट्यावरुन आत नजरेस येणारे ,सौंदर्याचा साज -पालेश्वर धरण. चवथा मैल पासून दिसणाऱ्या हिरव्या गार कडे कपारी-येथुन वरती असलेल्या माण धनगरवाडा येथूनच छत्रपती शिवरायांच्या व वीरधुरंधर मावळ्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली शौर्य वाट आहे.पन्हाळा-पावनखिंड मोहीम याच शौर्य वाटेवरुन आयोजित केल्या जातात.नागमोडी वळणे,डोंगार दरी झोंबणारा वारा आणी रिमझीम पावसातून येथला प्रवास,म्हणजे एक वेगळीच अनुभुती.

पावनखिंड दर्शनानंरत,भाततळी मार्गे केंबुर्णेवाडी ते विशाळगड व आंबा जाणारा मार्ग म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाणच.येथे निसर्गाने मुक्त हस्ताने निसर्ग सौंदर्याची उधळण केली आहे.नागमोडी विविध जैव विविधतेने व ग्रामीण जीवनाने नटलेली घाट वाट तीचा थाट काय येगळाच.डोंगरावर जणु नभ उतरलेत असा भास होतो.विविध पक्षी,शेतीवाडी यांमुळे सौंदर्य खुलुन येते.भाततळी मधून गेळवडे धरणाकडे जाता येते.
या सौंदर्यवान वाटेवरुन पुढे वंदनिय किल्ले विशाळगड जाता येते.तसच नागमोडी वळणे,जिथे सुर्याची किरणे सुद्धा दबकत उतरतात अशी किर्रृ झाडी,पशु पक्ष्यांचा आवाज,आणी रिमझीम पावसात कसरत करत येथून केलेला प्रवास स्वर्ग सुखच.
कोकण दर्शन पॉईंट तेथून निसर्गाचा देखणा अविष्कार वाघझरा दर्शन तेही पावसात वा क्या बात है.वाघझरा सौंदर्य पाहून डोळे दीपून जातात.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.