अनिता नारकर यांना यमुनाबाई खेर पुरस्काराने सन्मानित

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

समाजहितासाठी कार्य करणारे विश्वस्त समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक

रत्नागिरी प्रतिनिधी – चिपळूण तालुक्यातील पेढे-पर्शुराम येथे कार्यरत आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अनिता आत्माराम नारकर यांना वृद्ध, दिव्यांग, पीडित व गरजू व्यक्तींसाठी समर्पित कार्याबद्दल श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोदय छात्रालयाच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यात नारकर यांना साडी, चोळी, मानपत्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ, गीता व रोख ५,००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश माणिकराव सातवे यांच्या हस्ते झाले.

सातवे म्हणाले, “समाजहितासाठी कार्य करणारे विश्वस्त समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असून यमुनाबाई खेर ट्रस्टचे कार्यही त्याचप्रमाणे प्रशंसनीय आहे.” कार्यक्रमात प्रा. हरीशचंद्र गीते (माजी अध्यक्ष), ॲड. संदीप ढवळ (वर्तमान अध्यक्ष), गजानन चाळके (व्यवस्थापन समिती अध्यक्ष) व पांडुरंग पेठे (विश्वस्त) आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिता नारकर यांचे कार्य मुंबई महानगरपालिकेतील दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यावर, २०१८ साली त्यांनी आरती निराधार सेवा फाउंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून त्या वृद्ध, अनाथ व दिव्यांगांसाठी सेवा देत आहेत. त्यांच्या या कार्यास प्रेरणा त्यांच्या मुली आरतीकडून मिळाली असून, आरतीने मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. “माझी श्रीमंती ही पैशात नव्हे, तर माणसांच्या प्रेमात आणि ओळखीत आहे,” असे नारकर यांनी गौरव स्वीकारताना नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा विशेष गौरव केला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.