छ. शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं प्रतिक असलेलं संविधान संपवण्याचा भाजपचा डाव – राहुल गांधी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

छ. शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं प्रतिक संविधान आहे. जे शिवाजी महाराजांनी विचार दिले, त्याचे रूपांतर २१ व्या शतकात काय असेल तर ते संविधान आहे. ज्यासाठी शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्य लढले, जे कार्य केले, त्यांच्या विचारधारेनेच संविधान आले. मात्र सत्ताधारी भाजप हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे जोरदार टीकास्त्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलय. कसबा बावडा येथील भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावर कार्यक्रमाप्रसंगी त बोलत होते.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते आज कसबा बावडा येथील भगव्या चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं चे अनावरण करण्यात आलं. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा बहुशस्त्राधारी भव्य पुतळा साकारण्यात आलाय . खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टिका केली. देश सर्वांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, अन्याय करायचा नाही हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला दिल्याचं त्यांनी सांगितलं.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आज कोणतं प्रतिक असेल तर ते संविधान आहे. जे विचार शिवाजी महाराजांनी विचार दिले, त्याचं रूपांतर २१ व्या शतकात काय असेल तर ते संविधान असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानात एकही अशी गोष्ट सापडणार नाही ज्यासाठी शिवाजी महाराज लढले नाहीत. संपूर्ण आयुष्य ते लढले,त्यांनी ज्या विचारधारेनं कार्य केलं ,त्याच विचारधारेनं संविधान आलं . मात्र सत्ताधारी भाजप हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असाच उभारला जात नाही तर आपण एखादा व्यक्ती, त्यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याला मनापासून मानतो तेव्हाच उभारला जातो. आम्ही पुतळ्याचं अनावरण केलं . मात्र छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्यासाठी आम्ही लढलो नाही तर पुतळ्याला काही अर्थ नाही. जर शिवाजी महाराजांसारखे, शाहू महाराजांसारखे महापुरुष नसते तर आज संविधान नसतं . याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधान यांचं थेट कनेक्शन आहे असंही त्यांनी सांगितलं .

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळी, अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं विरोध केला.. त्याच विचारधारेशी आपण आता लढत आहोत. आपली लढाई त्या विचारधारेशी आहे. “शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिलाय . पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळ तो पुतळा कोसळला,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला .

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी,यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदा ३५० वं वर्ष असून या वर्षातच कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत असल्याचं सांगितलं. . कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. या भूमीत अठारा पगड जातींच्या कल्याणासाठी उत्तुंग कामगिरी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारलाय . या पुतळ्याचं अनावरण हे न्याय, समता, आणि निर्भयतेसाठी लढणाऱ्या राहूल गांधी यांच्या हस्ते होत आहे, हा ऐतिहासिक क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. . राहुल गांधी यांनी भारत जोडो, न्याय यात्रेच्या माध्यमातून भयभयीत झालेल्या घटकाला आधार दिला. त्यांच्या मनातील सर्वांना न्याय देणाऱ्या विचारांचं सरकार राज्यात आणू असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

खासदार शाहू महाराज यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळात अन्यायाविरोधात आवाज उठवला. सर्वांना बरोबर घेवून धर्मनिरपेक्षतेची विचारधारा रूजवली. शिवाजी महाराजांच्या याच विचारांची प्रेरणा या पुतळ्याच्या माध्यमातून मिळत राहील. असंही त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी, शिवाजी महाराजांनी केलेल काम चंद्र आणि सूर्य असे पर्यंत राहील.. पुतळा कोसळण्याची घटना इतिहासात कधी घडली नाही. दिवाळीच्या सणा प्रमाणे हा क्षण साजरा होत आहे, आमदार सतेज पाटील यांचं यामध्ये मोठं योगदान असल्याचे गौरव उद्गारही त्यांनी काढले.

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आल. या, कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहम्मद अरीफ नसीब खान आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू बाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार उल्हास पोवार, जिल्हा परिषदेच माजी अध्यक्ष राहुल पाटील, तेजस सतेज पाटील, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष रंगराव पाटील, उपसभापती अनंत श्रीहरी पाटील, सर्व विद्यमान आणि माजी संचालक, तसंच डी वाय पाटील कुटुंबतील सर्व सदस्य, कसबा बावडा-लाईन बाजारमधील सर्व विद्यमान आणि माजी नगरसेवक ग्रामस्थ, शिवप्रेमी, मोठया संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.