WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी जवळच्या १० गावांची क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घ्यावी – अमोल येडगे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

जिल्ह्यात क्षयमुक्त ग्रामपंचायतींसाठी  क्षयमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबवा

 जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायती क्षयमुक्तघोषित

 कोल्हापूर : वर्ष २०२३ मध्ये कोल्हापूर ग्रामीण मधील ८२ ग्रामपंचायती  क्षयमुक्त  झाल्या असून यासाठी सर्व घटकांनी परिश्रम घेतले. आता “क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी” जवळच्या १० गावांची  क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी  घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. छत्रपती शाहूजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे “क्षयमुक्त ग्रामपंचायती” च्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी अध्यक्षीय  भाषणावेळी ते बोलत होते. यावेळी करवीर तालुक्यातील पासार्डे, ऊपवडे, केकतवाडी, शेळकेवाडी या ग्रामपंचायातींचा “क्षयमुक्त ग्रामपंचायत” म्हणून म्हणून सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी म्हणाले, जर इतर ग्रामपंचायती क्षयमुक्त न होता तशाच राहिल्या तर आपल्याला क्षयमुक्त जिल्हा करता येणार नाही, त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेऊन आपला परिसरच क्षयमुक्त ठेवावा. तसेच यासाठी आरोग्य विभागाने “क्षयमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र” करण्यावर जोर द्यावा त्यामुळेही  केंद्रातील सर्व गावे क्षयमुक्त होतील.  पर्यायाने तालुका, जिल्हा क्षयमुक्त होण्यास मदत होईल. पुढील वर्षी हा “क्षयमुक्त ग्रामपंचायतीं”ची संख्या १०० च्या वरती जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी  येडगे यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. यांनी यावर्षी २०२४ मध्ये सर्व ग्रामपंचायतीनी क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियानात  भाग घ्यावा असे आवाहन केले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये “क्षयमुक्त  ग्रामपंचायती साठी पात्रता निकष सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे यांनी आरोग्य विभागाद्वारे क्षयमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र मोहीम राबवून जास्तीत जास्त गावे क्षयमुक्त करण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी करवीर तालुक्यातील पासार्डे, ऊपवडे, केकतवाडी, शेळकेवाडी  या ग्रामपंचायातींचा “क्षयमुक्त ग्रामपंचायत” म्हणून मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांचा ब्राँझ पुतळा व सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

 

यावेळी निवडलेल्या ग्रापंचायतींचे  सरपंच, उपसरपंच, संबधित प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व ग्रामसेवक यांनी पुरस्कार  स्विकारला. ग्रामपंचायत शेळकेवाडीचे सरपंच यांनी आम्ही अशाच पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने हा सन्मान पुढील वर्षी ब्राँझ वरून सिल्वर असा  कायम ठेवू अशी ग्वाही दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये 65 ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट राज्य स्तरावरून प्राप्त होते तथापि २०२३ मध्ये १०५ ग्रामपंचायतींनी या अभियानामध्ये भाग घेतला. या स्पर्धेत समितीने पडताळणी केल्यानंतर ८२ गावे टीबी मुक्त ग्रामपंचायत साठी पात्र ठरली अशी माहिती दिली. शिवाजी बर्गे यांनी आभार मानले. यावेळी गट विकास अधिकारी विजय यादव, अति. जिल्हा आरोग्य डॉ. उत्तम मदने, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.माधव ठाकूर, वैद्यकीय अधिकारी डॉ.परवेज पटेल, विशाल मिरजकर, दिया कोरे, धनंजय परिट, विनोद नायडू उपस्थित होते.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.