गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत लातूर नांदेडमध्ये केंद्र सक्षमीकरण अभियान उत्साहात
नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक युवासंत गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर (लातूर) आणि मगनपुरा (नांदेड) येथील सेवाकेंद्रात केंद्र सक्षमीकरण अभियान उत्साहात पार पडले. यावेळी सेवेकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
उदगीरमधील रामचंद्रनगर सेवाकेंद्र आणि नांदेडमधील मगनपुरा सेवाकेंद्रात गुरुपुत्र श्री. मोरे यांनी सेवेकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवाकेंद्र म्हणजे केवळ आध्यात्मिक सेवांपुरताच मर्यादित नसून राष्ट्र आणि समाज हिताचे बहुविध उपक्रम राबविणारे भक्कम व्यासपीठ आहे. स्वामींचे सेवाकेंद्र म्हणजे मठ, मंदिर, देऊळ असे काही नाही. सेवाकेंद्रात आध्यात्मिक सेवांप्रमाणेच लोकोपयोगी, समाजोपयोगी उपक्रम आणि राष्ट्रहिताचे कार्यक्रम राबविले जातात.
lकारण सेवामार्गात अध्यात्म केवळ वीस टक्के आणि ऐंशी टक्के समाजकारण केले जाते. विशेष म्हणजे सेवामार्गात महिलांना शंभर टक्के सेवेची संधी दिली जाते. या सर्व सेवा विश्वशांती ,राष्ट्रहित आणि समाजकल्याणासाठी घेण्यात येतात असे त्यांनी स्पष्ट केले .
अब्जचंडीची सेवा राष्ट्रहितासाठी…
अब्जचंडीची सेवा ही राष्ट्राच्या संरक्षणासाठीच घेतली जात आहे. ही सेवा सेवेकर्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी असे त्यांनी आग्रहाने नमूद केले. सेवामार्गातर्फे आगामी आठ जून रोजी होणारे बालसंस्कार शिबिर आणि २८ जून पासून सुरू होणारा भागवत सप्ताह या उपक्रमाविषयी श्री. मोरे यांनी सेवेकऱ्यांना माहिती दिली.