कुरुंदवाड येथील सैनिकी निवासी पॅटर्न शाळेतील 38 जणांना जेवणातून विष बांधा
14 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज , 6 कर्मचाऱ्यांच्यासह 15 विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू
काेल्हापूर : धक्कादायक, कुरुंदवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी निवासी पॅटर्न शाळेत विषबाधा झालीय. 34 विद्यार्थी 2 शिक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना रविवार सायंकाळी अचानक पोटात दुखून जुलाब,उलटी मळमळ असा प्रकार सुरू झाल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे समाेर आले. त्या सर्वांना तात्काळ सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रविवारी दुपारी झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती डॉ. रेखा तराळ यांनी दिली.औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांनी हॉस्पिटल मध्ये सोमवारी सकाळी भेट देऊन अहवाल तयार करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर कुरुंदवाड शहर डॉक्टर असोसिएशनच्या शहरातील सर्व डॉक्टरांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू केले. कुरुंदवाड येथील सैनिकी निवासी शाळेमध्ये रविवारी दुपारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणाबरोबर बासुंदी देण्यात आली होती.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना अचानक पोटात दुखून मळमळ ,उलटी, जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि अशक्तपणा येऊ लागल्याने 34 मुलांना असा त्रास सुरू झाला त्याचबरोबर 2 शिक्षक आणि 2 कर्मचाऱ्यांना हा त्रास जाणवू लागला. त्यांना सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मुलांची संख्या जास्त असल्याने डॉ.किरण अनुजे,डॉ.सारंग कोकाटे यांच्यासह नर्सिंग स्टाफची धावपळ सुरू झाली. बधितांची संख्या जास्त असल्याने.
डॉ.अनुजे यांनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश पट्टेकरी यांना माहिती दिली. यावेळी सुट्टीचा दिवस असूनही तत्काळ, शहरातील डॉ.धनंजय पाटील,डॉ.आर.एस.पाटील,डॉ.फल्ले,, डॉ. कुलकर्णी, डॉ.उमेश लंबेसह सर्वच डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आणि विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू केले.त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर हाेण्यास मदत मिळाली.
|
|
या सैनिकी निवासी शाळेत मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यातील 34 विद्यार्थ्यांना विषबाधा झाला आहे. 14 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून 6 कर्मचारी आणि 15विद्यार्थ्यांच्या वर अशा एकूण 21 जनांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत चेअरमन प्रा.शरदचंद्र पराडकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी दुपारच्या सत्रात जेवनानंतर जादा पाणी पिल्याने हा प्रकार घडला आहे.आता मुलांची प्रकृती स्थिर आहे असे सांगितले.