नाशिक…////
यावर्षी समाधान कारक झालेले पर्जन्यमान. भरलेली धरणे. खळखळून वाहणाऱ्या नदी, नाले. यातूनच सर्वसामान्य नागरिकांसह सृष्टीलाल खऱ्या अर्थाने संपुर्ण सजीवसृष्टीस आनंद देणारे व धनधान्य समृध्द करणारे वातावरण निर्मिती पाहताना निश्चितच आनंद वाटतो. प्रसन्नता वाटते.. जलस्च्छता, प्रदूषण दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करताना यातून खूप मोठे आत्मिक समाधान मिळते. आपले पर्यावरण, निसर्ग. नदी नाले टिकले तरच व्यक्ती जीवनाचे आयुष्यमान उंचावणार आहे. सभाेवतालचा परिसर सुझलाम सुफलाम होणार आहे.
संत, शासन व समाज यांच्या सहकार्याने पर्यावरणाचा समतोल राखला. ओद्योगिक प्रगती बरोबर जनतेच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जावू शकते . हा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून कपिला नदी संवर्धन समिती तपोवन व अन्य सहकारी पर्यावरण प्रेमी यांच्या वतीने दरवर्षी कपिला गोदावरी संगम येथे गोदावरी नदी जलपूजन करण्यात आले.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
कुंभमेळ्याचे संयोजक महंत डॉ भक्तीचरणजी महाराज, नाशिक महानगपालिका पंचवटी विभागीय अधिकारी मा हरिश्चंद्र मदन, उच्च न्यायालय समितीचे निशिकांत पगारे, यांचे हस्ते जल पूजन करण्यात आले. यावेळी नदीचा तोल सांभाळला तर शहराचा विकास होईल. नदी राहिली नाही तर शहर भकास होईल. नदी वाचवा शहर वाचवा .असे निशिकांत पगारे यांनी सुचविले तर कपिला नदी संवर्धन समितीतर्फे दररोज कपिला नदी संगम येथे सायं 7 वाजता रामकुंड ते तपोवन एक साथ आरती आयोजन करण्यात यावे. याने नदीचे पवित्र व महात्म्य अबाधित राहील असे महंत डॉ भक्तीचरणदास जी महाराज यांनी सांगितले..
कपीला नदी आयोजन समितीचे योगेश बर्वे व दीपक बैरागी यांनी केले. यावेळी महंत बैजनाथ महाराज यांनी पौराहित्य केले. यावेळी वरुणा नदीचे सुनील परदेशी, पप्पु टीले, नंदिनी नदीचे प्रा.सोमनाथ मुठाळ , डॉ.अजय कापडणीस, ऊमा परदेशी, मनोज साठे, चंद्रकिशोर पाटील, दिगंबर कुलथे, जयवंत देशमुख सरला अंडे, सतीश पिठे आदी उपस्थित होते..