आध्यात्मिक सेवेने कोणताही प्रश्न सुटतो : गुरुवर्य नाथस्वामी
मुंबई ( प्रतिनिधी): योग्य नियम पाळून आध्यात्मिक सेवा मनोभावे केली तर कोणताही प्रश्न सहज सुटू शकतो असे विचार गुरुवर्य नाथस्वामींनी मांडले. यावेळी त्यांनी सेवेकऱ्यांना अध्यात्मातील अनेक दाखलेही दिले.
मुंबईतील लोअर परेल डिलाईल रोड (पूर्व)येथील नाथस्वामी बेकरी मठामध्ये नाथस्वामींचा सत्संग अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या रसाळ आणि प्रासादिक वाणीतून सेवेकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. मठाचा इतिहास सांगताना ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी एका बेकरीमध्ये स्वामीकार्याची सुरुवात झाली. दुःखी ,कष्टी लोकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम बेकरीतून होऊ लागले. पुढे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने बेकरीचे मठात रूपांतर झाले आणि महाराजांच्या आज्ञेने नाथस्वामी बेकरी मठ असे नामकरण झाले. मठात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अपार मनःशांती लाभते, प्रश्नोत्तर सेवेच्या माध्यमातून रंजल्या गांजलेल्या लोकांना आधार मिळतो आणि स्वामी सेवाकार्याचा प्रचार-प्रसार होतो. सकाळी आणि सायंकाळी दैनंदिन आरती, सकाळी महानैवेद्य आणि दर गुरुवारी महाप्रसादाचे वाटप होते. रविवार आणि काही दिवसांचा अपवाद वगळता दर दिवशी प्रश्नोत्तरे सेवा होते. श्री स्वामी महाराज जयंती आणि गुरुपौर्णिमा असे वार्षिक उत्सवही साजरे केले जातात. हे सारे उपक्रम आणि सेवा स्वतः महाराज भक्तांकडून करून घेतात असे नाथस्वामींनी नम्रपणे नमूद केले.
आदर्श पिढी घडविण्यासाठी सुसंस्कार महत्त्वाचे: युवासंत नितीनभाऊ मोरे
स्वामींची सेवा आध्यात्मिक प्रगतीसाठी..
आपल्या सत्संगात ते पुढे म्हणाले की, बहुतेक सेवेकरी सेवा करतात आणि भौतिक सुखाच्या लालसेची मागणी करतात. मात्र हे योग्य नाही. स्वामींची सेवा अशा भौतिक गोष्टींच्या पूर्ततेसाठी खर्च करण्याऐवजी आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. भौतिक सुखाच्या पूर्ततेसाठी इतर वेगवेगळ्या आध्यात्मिक सेवा आहेत. आपले प्रश्न कोणते त्यानुसारही आध्यात्मिक सेवा ठरलेल्या आहेत. त्यामुळे क्षुल्लक गोष्टींसाठी महाराजांची केलेली सेवा खर्ची टाकू नका असा उपदेश त्यांनी केला.
विश्वकल्याणासाठी स्वामी सेवामार्गातर्फे मथुरेत २७ जूनपासून भागवत सप्ताह
श्री स्वामी महाराज कधी एका जागेवर स्थिर राहिले नाहीत. अक्कलकोटमध्ये २२ वर्षे वास्तव्य केले तरी महाराज नेहमी या ना त्या गावात संचार करून दुःखी लोकांना मार्गदर्शन करीत होते. यावरून सेवेकर्यांनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण स्वतःपुरते जगण्याऐवजी लोकांना उपयोगी पडले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगता आले पाहिजे, जो दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याचे, त्याला धीर-दिलासा देण्याचे काम करतो असा सेवेकरी महाराजांना सर्वाधिक प्रिय आहे असे नाथस्वामींनी स्पष्ट केले.
मूल्यसंस्कारातून सशक्त राष्ट्राची निर्मिती: युवासंत नितीनभाऊ मोरे