काेल्हापूरः गांधीनगर तालुका करवीर (काेल्हापूर) येथे सिटीसर्वे नंबर १६५६ या भूखंडावर इंदरलाल हरिराम पोखरेजा हे बेकायदेशीर विनापरवाना असुरक्षित बांधकाम करत आहेत. उंचगाव तालुका करवीर येथील गट नंबर 177/2 मधील भूखंडावर सनी निर्मल वधवा यांनीही बेकायदेशीर रित्या विनापरवाना असुरक्षित बांधकाम केले आहे. तरी त्यांची चौकशी होऊन संबंधित बांधकाम जमीन उद्ध्वस्त करून कंत्राटदार व बांधकामधारक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
राज्य शासनाने बांधकाम करत असताना नियम व अटींचे पालन केलेले नाही. विनापरवाना बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी असे आदेश काढलेत, मात्र येथे मला जमीन उद्योग करून योग्य तो मला न्याय मिळावा .ही विनंती कोल्हापूर ग्रामपंचायत अगर नगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सदरच्या बांधकामास परवानगी दिली नसल्या कारणाने हे बेकायदेशीर बांधकाम आहे, तरी ते त्वरित पाडावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे गांधीनगर शहराध्यक्ष अंकुश वराळे यांनी केली आहे.
या मागणीला अद्याप न्याय न मिळाल्याने त्यांनी कार्यकर्त्यांसोबत उपोषणाचा पर्यायी मार्ग निवडला आहे. 13 तारखेपासून हे उपाेषण सुरु आहे. काेल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर हे उपाेषण सुरु आहे. हे उपाेषण गेले तीन दिवस सुरु असून, अद्याप काेणा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतलेली नसल्याने अंकुश वराळे यांनी याविषयी नाराजी व प्रशासनाचा संताप व्यक्त केलाय. न्याय मिळणार की नाही, असाही सवाल त्यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना केला.