काेल्हापूरः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयं प्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी 2017 पासून प्रत्येक वर्षी स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जातो.काेल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिकेने २ ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा आयोजित केला असून यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार हे अभियान राबविण्यात येणार आहे
स्वच्छता मोहीम आयोजित करणे निर्माण संकलन करणे,वर्गीकरण व त्यापासून कंपोस्ट खताची मोहीम राबवणे, तसेच यासाठी कोल्हापूर शहरातील एनजीओंना सहभागी करून घेणे असे कार्यक्रमाचे नियोजन आहे. कोल्हापूर शहरातून प्रति दिवस 290 टन कचरा संकलित केला जातो आणि त्यावर कसबा बावडा कचरा प्रक्रिया प्रकल्प समूह येथे प्रक्रिया केली जाते. २९० टन कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेकडे १७४ टिप्पर वाहने असून, ही वाहने घरोघरी जाऊन कचरा संकलन करतात. कोल्हापूर शहरात एकूण. एक लाख ६० हजार इतके हाऊसहोल्ड आहेत. या एक लाख ६० हजार घरांमधून कचरा संकलित करताना प्रत्येक टिप्परला प्रतिदिन सरासरी ९०० घरांच्या मधून कचरा संकलित करावा लागतो. यासाठी सकाळी सहा ते दोन आणि दुपारी दोन ते रात्री दहा अशा दोन शिफ्ट मध्ये कचरा संकलन करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे वरील ठिकाणी १५० टन आरडीएफ प्रकल्प ५३ टन विंड्रो कंपोस्ट खत प्रक्रिया प्रकल्प , स्लरी प्रकल्प, हॉर्टिकल्चर प्रकल्प ,बायोगॅस प्रकल्प, 75 केएलडी लिचड प्रक्रिया प्रकल्प,एस.टी पी प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प वरील प्रमाणे एकूण आठ प्रकल्प कार्यान्वित आहेत यांच्या माध्यमातून शहरातील घनकचरा बायोमेडिकल वेस्ट तसेच ड्रेनेज वॉटरवर प्रक्रिया प्रकल्प राबवली जातात. |
![]() |