व्हीडीओ पहा ! काेल्हापूर मिरज रेल्वे मार्गाविषयी खासदार धनंजय महाडिक यांची माेठी मागणी…सविस्तर वाचा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काेल्हापूर रेल्वे मार्ग गेली अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. महाराष्ट्रातील परिचित तसेच महत्वाचे असलेले एका टोकाला असलेले हे शेवटचे रेल्वे् स्थानक उद्याेग, व्यवसाय, पर्यटनसाठी महत्वाचे आहे. मात्र याकडे म्हणावे तसे गांभिर्याने, लक्ष दिले गेले नसल्याने खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत विशेष मागणी केली. या मागणीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यामुळे रेल्वे प्रवाशी वर्गाबराेबरच सांगली, काेल्हापूरवासियांनाही दिलासा मिळाला आहे. 

मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण होणे आवश्यक, उद्योग, व्यवसाय, पर्यटन वाढीसह नव्या गाड्या सुरू होण्यासाठी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण अत्यंत गरजेचे असल्याचे  खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मागणी करताना सांगितले.कोल्हापूरला व्यापारी आणि पर्यटनदृष्टया मोठे महत्व आहे. त्यामुळेच वर्षभर कोल्हापुरात लाखो प्रवासी आणि पर्यटक येतात. अशा वेळी कोल्हापूरला जोडणार्‍या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण होणे आवश्यक आहेे. कोल्हापुरला कला-क्रीडा-संस्कृती-इतिहास यांचा मोठा वारसा असून, औद्योगिकदृष्टया सुध्दा कोल्हापूर महत्वाचे शहर आहे. अशा वेळी मिरज- कोल्हापूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण तातडीने सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.

खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष्यवेधी मांडलेले मुद्दे असे. 

दरवर्षी लाखो भाविक, पर्यटक आणि उद्योजक कोल्हापुरात येतात. मात्र मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण रखडले असल्याचे, खासदार महाडिक यांनी सांगितले. वंदे भारत एक्सप्रेससह नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी मिरज – कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी खासदार महाडिक यांनी, आज राज्यसभेत सविस्तर भुमिका मांडली. कोल्हापूर जिल्हयात ऊस आणि गुळाचे मोठ्याप्रमाणात उत्पादन होते. शिवाय फौंड्री, कापड उद्योग यातूनही मोठी उलाढाल होते. नजीकच्या काळात कोल्हापूर रेल्वे स्थानक कोकण रेल्वेला जोडले जाणार आहे. अशा वेळी मिरज – कोल्हापूर या ४७ किलोमीटरच्या मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना नमुद केले.

नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून खासदार धनंजय महाडिक यांनी, सक्रीय सहभागी होत, अनेक विषय आणि मुद्दे राज्यसभेत मांडले आहेत. आज खासदार महाडिक यांनी, मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करणे का आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर विवेचन केले. कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून, पर्यटन आणि कृषी, व्यापार, उद्योग क्षेत्रातील आघाडीचा जिल्हा आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.