उद्यानात संदर्भात योग्य आणि ठोस उपाययोजना न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कोल्हापूर शहरात उद्यान बचाव चळवळ उभी केली जाईल.
कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील 54 उद्यानांच्या दुरावस्थेत संदर्भात उपायुक्त नितीन देसाई यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी चर्चेप्रसंगी बोलताना शहरचिटणीस बाबुराव कदम, भाई कुमार जाधव, भाई संभाजीराव जगदाळे, भाई डॉ. संदेश कचरे आदींनी चर्चेत बोलताना, पूर्वीच्या खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करू इच्छिणाऱ्या सेवकांनी या बगीचांची निर्मिती दूरदृष्टीकोण ठेवून केली व त्या समाज हितासाठी बाग बगीचे जोपासले.
पण सध्याच्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तसेच कर्मचारी वर्गाने स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही बघितले नाही. परिणामी शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आल्याची लक्षणे संपूर्ण शहरात दिसतात. तरी येत्या पंधरा दिवसात उद्यानात संदर्भात योग्य आणि ठोस उपाययोजना न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कोल्हापूर शहरात उद्यान बचाव चळवळ उभी केली जाईल. असा इशारा देण्यात आला.
यावर उपायुक्त नितीन देसाई यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सदरच्या निवेदनाचे वाचन भाई सचिन जाधव यांनी केले. या शिष्टमंडळात भाई सुभाष सावंत, मोहन पाटील, मधुकर हरेल, शाहीर रंगराव पाटील, सलीम पटवेगार ,उमाजी सनदे आदींनी सहभाग घेतला.