सकल हिंदू समाजाच्या मागण्यांचा घोषणापत्रात निश्चित समावेश करण्याविषयी प्रयत्नशील!- धनंजय महाडिक
कोल्हापूर – विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘अंमलबजावणीचा आराखडा’ म्हणून महायुतीचे संकल्पपत्र जनतेसमोर येणार आहे. यासाठी 15 जणांची समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. या समितीने राज्यभरातून जनतेची मते मागवली आहेत. कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे या समितीचे सदस्य आहेत.
या संदर्भात २८ ऑक्टोबरला सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनीत्यांना भेटून हिंदू समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहादच्या विरोधात कठोर कायदा करावा. गोतस्करीच्या विरोधात कठोर कायदा करावा यांसह अन्य मागण्या आहेत. यातील बहुतांश मागण्या या रास्त असून त्यांचा समावेश घोषणापत्रात केला जाईल, असे आश्वासन धनंजय महाडिक यांनी दिले. सकल हिंदू समाजाच्या वतीने खासदार महाडिक यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले.
धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘या समितीकडे लाखोंच्या संख्येने सूचना आल्या आहेत. येत्या ३-४ दिवसात या समितीची बैठक होऊन याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल. वरील मागण्यांसमवेत गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे निघाली पाहिजेत ही सकल हिंदू समाजाची आग्रही मागणी आहे. हिंदूंना न्याय देण्याच्या दृष्टीने केंद्र शासन ‘वक्फ’च्या संदर्भात कायदा करत आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा घोषणापत्रात समावेश करण्याच्या दृष्टीने नक्कीच माझे प्रयत्न रहातील.’’
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि अर्जुन आंबी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्आशिष लोखंडे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे आनंदराव पवळ, चिंतामणी सेवक फाऊंडेशनचे सोहम कुराडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री संग्रामसिंह निकम, प्रसन्न शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, ‘मराठा तितुका मेळवावा’चे योगेश केरकर, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, अभिजीत पाटील यांसह अन्य उपस्थित होते.