कुंभोज-विनोद शिंगे संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या सीएसआर विद्यार्थी क्लबने पाठक ट्रस्ट मिरज संचलित…
Category: पर्यावरण
जर लघवीला रंगच नसेल आणि ती पाण्यासारखीच पारदर्शक असेल, तर आपले आरोग्य! सविस्तर वाचा
पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. मात्र गरज नसताना पाणी…
आज काेणता दिवस माहितीय का? त्या आठवणीसाठीच साजरा केला जाताेय हा दिन-राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
दरवर्षी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा विशेषत: संवेदनशील भारतीयांसाठी एका विचित्र मानसिक अवस्थेत जातो. कारण १९८४ साली…
जी.जी.पाटील शिराळा
काळुंद्रे येथील बाळासाहेब यांचा स्वच्छतेचा संदेश
आपले गाव स्वच्छ व सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटते.आपला गाव स्वच्छ राहावा यासाठी काळुंद्रे गावचे प्रमुख ठिकाण म्हणजे मंदिराचा परिसर, ग्रामपंचायत ऑफिस व मुख्य रस्ता याची हातामध्ये झाडू घेऊन दररोज स्वच्छता करणारे बाळासाहेब विष्णू पाटील यांच्यामुळे मंदिर परिसरालाही शोभा आली व स्वच्छतेमुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली व देवही शोभून दिसू लागला.
बाळासाहेब हे प्रत्येक सामाजिक कार्यात पुढे असतात,आपल्या दिवसभराच्या वेळेमधला काही वेळ दररोज गावच्या मुख्य परिसराच्या स्वच्छतेसाठी ते दररोज देतात.त्यांना इतरही लोक मदत करत असतात.त्यांच्या प्रमाणे गावचा प्रत्येक नागरिक आपलं घर व आपल्या घरासमोरचा परिसर व आपल्या घरासमोरचा रस्ता स्वच्छ करू लागला.
प्रत्येकाने स्वच्छतेसाठी दररोज फक्त दहा मिनिटे दिली तर एक दिवस नक्कीच आपला गाव स्वच्छ व सुंदर होईल. आपल्या गावच्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुधारेल व पर्यायाने गावच्या प्रत्येक नागरिकाचे आयुर्मान वाढेल यासाठी गावातील सर्व तरुण मंडळे व ग्रामपंचायत काळूंद्रे यांनी पुढे येऊया.
या स्वच्छतेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक नागरिकांनी आपला गाव म्हणजेच प्रत्येकाच्या घरासमोर चा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करूया व ही स्वच्छतेची चळवळ पुढे नेऊया. बाळासाहेब पाटील त्याचप्रमाणे आपले घर व आपल्या घरासमोरचा परिसर व रस्ता स्वच्छ ठेवूया.
जी.जी.पाटील, शिराळा
चांदोली अभयारण्या शेजारील दहा किलोमीटर अंतरावरील शेतशिवारात वानरे ऊस,भुईमूग, पावटा इ.चा पाडतात मोर ,लांडोरी पेरलेलं धान्य व आलेले मोड उगवूच देत नाहीत. गवे उभी पिके फस्त करतात .बिबटे मानवावर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. इथले उदरनिर्वाहाचे साधनच वन्याप्राण्याकडून हिरावून घेतले जात आहे.मणदूर, उखळू या गावातील कित्येक एकर शेती पिकाविना पडून आहे.त्यामुळे आम्ही जगायच कसं असा सवाल चांदोली अभयारण्या शेजारील गावे व वाड्यावस्तीवरील शेतक-यांच्यातून उपस्थित केला जात आहे. शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, मिरुखेवाडी, जाधववाडी, कोळेकरवाडी,मणदूर धनगरवाडा, खुंदलापूर, तर शाहुवाडी तालुक्यातील उखळू,शित्तूर, शिराळे,खेडे यासह वाड्यावस्तीवरील बिबट्यांचे पाळीव प्राणी तसेच मानवावरील होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनू लागला आहे.
वानराकडून ऊसाचा फडशा पाडला जातो,भुईमूग, पावटा,मका ही पिके शेतक-यांच्या पदरात पाडू देत नाहीत.गवे उभी पिकेच फस्त करतात.तर मोर ,लांडोरी तर पेरलेले धान्य उकरून खावून टाकतात.पेरलेले उगवूच देत नाहीत.तर बिबटे व हिंस्र वन्य प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांच्या वरील हल्ल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे.
या परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.त्याला जोडधंदा म्हणून शेळ्या मेंढ्या ,गाईम्हशी हे उदरनिर्वाहाचे जगण्याचे प्रमुख साधन आहे.तेच आता बिबटे व जंगली हिंस्र प्राणी हिरावून घेत आहेत. शासनाकडून ही तुटपुंजी मदत मिळत आहे. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.तरीही शासनाचा वन्यजीव विभाग मुग गिळून गप्प का ? असा सवाल शेतक-यांच्यातून उपस्थित होत आहे.यानिमित्ताने पुन्हा एकदा अभयारण्या भोवताली कुंपनाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. शासनाच्या वन्यजीव विभागाकडून ठोस उपाययोजनां करणे आवश्यक आहे.अन्याथा येथील शेतकरी उध्वस्त होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अभयारण्यात खाद्याची कमतरता,पर्यटनाच्या गाड्यांचा कर्कश आवाज यामुळेच जंगलातील बहुतांश प्राणी खाद्याच्या शोधासाठी मानवी वस्ती जवळपास व ऊसाच्या फडात आश्रय घेवू लागलेत.सहजच शिकार उपलब्ध होत असल्याने अभयारण्यात वन्यप्राणी दिसेना झालेत.याचा वन्यजीव विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.