पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
POSITIVVE WATCH DIGITAL MEDIA AND YOUTH ASSOCIATION कडूनही खूप खूप शुभेच्छा
कोल्हापूर : विजेच्या प्रवाहाचा धक्का जीवघेणा ठरू शकतो. विजेच्या बाबतीत ‘चुकीला माफी नाही’. दैनंदिन विजेच्या वापरात विद्युत सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. विद्युत सूरक्षा नियमांचे पालन करून संभाव्य जीवित व वित्त हानी टाळणे शक्य आहे. या हेतूने विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी महावितरणकडून इचलकरंजी शहरात महात्मा गांधी जयंतीदिनी विद्युत सुरक्षा जनजागृती फेरी काढण्यात आली.
प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. अधिक्षक अभियंता श्री.अंकुर कावळे यांनी विद्युत सुरक्षा जनजागृती फेरीस हिरवी झेंडी दाखविली.
कावळे म्हणाले की, ग्राहकांनी विद्युत संच मांडणीचे अर्थिग करुन घेणे व वेळोवेळी अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेणे अत्यावश्यक आहे. सुरक्षित वीज वापरासाठी सुरक्षा नियम पालन करणे हाच उपाय आहे. ग्राहकांनी वीज वापरताना घ्यावयाची काळजी व उपाययोजनाबाबत संदेशाचा प्रसार फेरी दरम्यान करण्यात आला. विद्युत सुरक्षा विषयक माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी महावितरणकडून विद्युत सुरक्षेबाबत जनजागरण सुरु आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते, सुनील अकिवाटे, श्री.प्रशांत पाटणकर, रमेश कदम, उपव्यवस्थापक (मानव संसाधन) सुहास वडणगेकर, उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) महेश खांडेकर, सर्व शाखा अभियंता, तंत्रज्ञ उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.