धाडस- डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली शाबासकी !अपहरणाचा डाव उधळला; बलभीम ननवरे धावून आला..वाचा सविस्तर नेमकं काय घडल

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सिंहगड एक्सप्रेसमधून मुलीच्या अपहरणाचा डाव सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांच्या सतर्कतेमुळे विफल ; उपसभापती

मुंबई:- “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद आपल्या कर्तव्यबुद्धीने जपणारे सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांचा आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ, शाल आणि अभिनंदन पत्र देवून सन्मान केला, ०८ फेब्रुवारी रोजी सिंहगड एक्सप्रेसने पुण्याला कोर्ट कामासाठी जात असताना त्यांना रेल्वेच्या डब्यात ३० वर्षीय इसम ०८ वर्षीय मुलीला घेऊन प्रवास करीत असताना दिसला, अखंड सावधचित्त असणे हा पोलीसी संस्कार अंगी बाणवलेल्या ननवरे यांच्या नजरेतून या ३० वर्षीय इसमाच्या संशयास्पद हालचाली सुटल्या नाहीत, मुलगी मराठीमध्ये बोलत होती तो इसम हिंदी मधून बोलत होता, ननवरे यांनी आपल्या पोलीस स्टाईलने उभयतांशी संवाद साधत माहिती घेण्यास सुरुवात केली. एकदा तो ३० वर्षीय इसम म्हणजे दयानंदकुमार शर्मा (बिहार) ही आपली मुलगी असे सांगायचा तर कधी ही आपली बहीण आहे असे सांगायचा.

मुलीला आपल्या मामाचा मोबाईल क्र. तोंडपाठ असल्याने ननवरे यांचे काम सोपे झाले, त्यांनी तात्काळ मुलगीचे मामा सचिन शेलार यांच्याशी संपर्क साधला. मामानी आपल्या बहिणोशी संपर्क साधून माहिती घेतली आणि ननवरे यांना आपली भाची पळवून नेली जात असल्याचे तात्काळ कळविले, मामांना पुणे स्टेशनवर बोलवण्यात आले आणि आरोपी शर्मा यांचा मुलीस पळवून नेण्याचा डाव सतर्कतेमुळे उधळला गेला. ननवरे यांनी सावधानता बाळगली नसती तर आरोपो शर्मा यांचे दृष्ट हेतू पूर्ण झाले असते….

महिला जागृती आणि सबलीकरणासंदर्भात सदैव कार्यमग्न असणा-या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांच्या कानावर  ननवरे यांचे प्रसंगावधान आणि त्यामुळे मुलीचे टळलेले अपहरणाबाबतची ही घटना  जाताच त्यांनी या कामगिरीबद्दल त्यांना विधानभवनातील आपल्या दालनात निमंत्रित केले आणि त्यांचा सन्मान केला, तसेच याबाबत डॉ, गोन्हे यांनी ननवरे यांनी केलेल्या सन्माननीय कामाबाबत लेखी अभिनंदनाचे पत्र ही लिहीले. तसेच त्यांचा यथाेचित सत्कारही केला. यावेळी डॉ. गो-हे यांनी आपल्या मुलांबाबत पालकांनी जागरुक रहावे व अनोळखी व्यक्ती सोबत त्यांना शाळेत अथवा घराबाहेर पाठवू नये असे आवाहनही केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांचे या उल्लेखनीय सतर्कतेबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अशा घटना समाजात काेठे ना काेठे तरी घडत असतात. त्यामुळे, सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे, सतर्क राहून जागृक राहिल्यास नक्कीच समाजात अशा घटना राेखल्या जातील. सावधानता बाळगली जाईल. असे कर्तवदशक्ष पाेलीस अधिकारी असतात, हे देखिल यातून सिद्ध झालेय.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.