काँग्रेसचा आक्रमक चेहरा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनाच मुख्यमंत्री करावे-प्रवक्ते संतोष पाटील
सांगली- राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील व महा विकासआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते. यामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाच्या येणार असल्याने सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष असू शकेल असा विश्वास सांगली येथील प्रवक्ते संताेष पाटील यांनी व्यक्त करीत, याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जाते. कारण वेळोवेळी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे व विरोधकांना त्यांची जागा दाखवून देणारे काँग्रेस पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हेच समाेर असतात. त्यांचे नेतृत्व महाराष्टाने मान्य केले असून, नाना पटाेले यांनाच महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांना करत आहोत अशी माहिती, संताेष पाटील यांनी देत, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी,लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पत्राद्वारे माहिती कळवणार असल्याचे प्रवक्ते संतोष पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.