पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या ठेवीदारांना द्यायला कॅश उपलब्ध नाही! मग बँकेच्या डबघाईस जबाबदार असलेल्या अपात्र घोषित चेअरमन,मॅनेजर,लोन ऑफिसर व संचालक मंडळावर कारवाई केव्हा?
शिरपुर (प्रतिनिधी):- तालुक्यातील एकेकाळी नामांकित असलेली दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक लि. आता अत्यंत गंभीर आर्थिक अवस्थेत लोटण्यास नियमबाह्य, असुरक्षित व विनातारणी कोट्यावधी रुपयांचे कर्ज संगनमताने काही वर्षांपासून वितरण करणारेच जबाबदार आहेत,हे सूर्यप्रकाशा ऐवढे सत्य आणि स्पष्ट आहे.दररोज नवनवीन अशी नियमबाह्य कर्ज प्रकरणे उजेडात येत असल्याने आता ठेवीदारांची ठेव काढायला प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे.काही दिवस जोपर्यंत काही प्रमाणात डिपाजिट रक्कम बँकेत शिल्लक होती, वाटप करण्यात आली. नंतर रिझर्व्ह फंड सुध्दा वापरून टाकले.आता परिस्थिती गंभीर आहे.
स्वत: बँकेच्या मॅनेजरने दिनांक 8 डिसेंबर रोजी बँकेच्या बाहेर गेटवर बँकेत कॅश उपलब्ध नसल्याची स्वतःच कबुली दिली आहे आणि कॅश उपलब्ध होईल तेव्हा देऊ असा बोर्ड लावला आहे. म्हणजे ठेवीदारांनी काय अर्थ लावायचा?आता विनातारणी कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेणारे लाभार्थी सोडून आपल्या प्रापर्टीज तारण ठेवून इमाने इतबारे कर्ज घेतलेल्या कर्जदारांना वेठीस धरले जाते आहे.म्हणजे “चोरांना सोडून संन्याशाला फाशी” असेच म्हणावे लागेल.या बँकेचे सर्व कार्य अत्यंत नियमानुसार व चोखपणे करणारे आपल्या शहरातील या बँकेचे अत्यंत तथाकथित कर्तव्यदक्ष मॅनेजर ? लोन ऑफिसर व संचालक मंडळावर? आता ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यासाठी होत असलेल्या त्रासाची जबाबदारी निश्चित करून कार्रवाई करावी ही मागणी ठेवीदारांकडून होत आहे.
या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी धुळे जिल्हा जागृत जनमंच च्या संस्थापिका डॉ सरोजताई पाटील यांनी ठेवीदारांना तक्रारी दाखल करण्यासाठी आवाहन केले आहे.रिझर्व बँकेचे सर्व नियम कायदे आणि सहकारी बँकांचे नियम, उपविधी धाब्यावर बसवून ही बँक डबघाईस आणणा-यांवर फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची कार्रवाई व्हावी याकरिता बँक बचाव समितीला सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती डॉ. सरोजताई पाटील यांनी ठेवीदारांना मोबाईल नंबर-7066623818 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
बँकेतील अन्य भ्रष्टाचारांच्या बातम्यांची मागील मालिका वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा…
बँक व ग्राहक यांच्यात समन्वय साधणारी किंवा बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेवणाऱ्या समितींची गरज-डॉ. सरोजताई पाटील संस्थापिका अध्यक्ष धुळे जिल्हा जागृत जनमंच
खरतर बँका, पतसंस्था, काे आँपरेटिव्ह बँकामध्ये ग्राहक माेठ्या विश्वासहर्ताने आपल्या कष्टाचा पैसा जपून ठेवत असतात. याच पैशाच्या आधारावर त्यांना मुलांची लग्न, नाेकरी, व्यवसाय, उर्वरित आयुष्याची स्वप्न रंगवायची असतात. वृद्धापकाळ, निवृत्तीनंतर पैसा त्यांना महत्वाचा ठरत असताे. यासाठीत ते आपल्या रकमेची जपणूक अशा बँका, पतसंस्था,को. आँपरेटिव्ह संस्थेत करत असतात. परंतु, काही बँका, पतसंस्था, को आँपरेटिव्ह बँकामधील असे घोटाळेंची प्रकरण व मालिका पाहता, यावर अंकूश घालणे कायमचे गरजेचे आहे. आजही कित्येक ठिकाणी अप्रत्यक्षरित्या असे घोटाळे सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही.. ग्राहकांचा पैसा लाटण्याचा प्रकार काही जण पडद्यामागे करतात किंवा अन्य कंपनी, या नातेवाईकांच्या व्यवसायात गुंतविण्यात येत आहे. नातलगांच्या नावावर कर्ज पुरवठा करणे व ताे बुडाला की हात वर करण्याचे प्रकार आजही काही ठिकाणी घडत आहेत, का याची पडताळणी करणे गरजेचे आहे. अन्यथा, धनदांडगे लाेक गाेरगरिबांचा पैसा हडप करायलाही घाबरणार नाहीत. यासाठी प्रत्येक बँका, पतसंस्था, को आँपरेटिव्ह बँकामध्ये आपला पैसा सुरक्षित आहे, की नाहीय, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासन व खासगी स्तरावर व्यवहार देखरेख समिती नेमने काळाची गरज आहे. लेखाजोगा विभागाकडून दर सहा महिन्याला माहिती मागविणे गरजेचे आहे. यावर तज्ञ लाेक व ग्राहक, ठेवीदार, पत्रकार, निवृत्त बँकेतील अधिकारी, कर्माचारी असले पाहिजेत, त्यांच्याकडून वर्षातून किमान दाेन वेळा ब्ँकेच्या व्यवहारांचा तपशील मिळाला पाहिजे, या ताे जाहीर झाला पाहिजे, असे काही बँक क्षेत्रातील तज्ञ मंडळी तसेच डॉ. सरोजताई पाटील संस्थापिका अध्यक्ष धुळे जिल्हा जागृत जनमंच यांनी सांगितले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.