पाऊस वाढताेय… रेल्वे पुलावर पाण्याचा धाेका.. मिरज – काेल्हापूर प्रवासाला अडथळा?

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

काेल्हापूरः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदी धाेक्याच्या इशारा पातळीकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला राधानगरी धरण देखिल अवघ्या पाचफुटानंतर भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे याचा परिणाम, काेल्हापूर शहरात असणाऱ्या पंचगंगा नदीमुळे मिरज काेल्हापूर विभागावरील रुकडी, गुळ मार्केट रेल्वे स्थानाकादरम्यान असणारा रेल्वेचा महत्वाचा पूल पाण्याखाली गेल्यास, रेल्वे वाहतुकीवर परिणाम हाेऊ शकताे.  पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वे गाड्या चालविणे असुरक्षित हाेऊन रेल्वे प्रशासनाला रेल्वे वाहतूक बंद करावी लागू शते, या निर्णयामुळे मिरज काेल्हापूर हा रेल्वे मार्ग बंद हाेण्याची शक्तयाता नाकारता येत नाही, असे  पुणे  मध्य रेल्वे पुणे विभागाच्या जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध पत्रक देण्यात आले आहे. 
राधानगरी धरण उर्ध्व प्रवाह आणि अलमट्टी धरण ही दोन मोठी धरणे पंचगंगा पुलावरून पाण्याचा प्रवाह नियंत्रित करतात.पंचगंगा पूल क्र.36/1, मिरज-कोल्हापूर विभागावरील रुकडी आणि गुरुमार्केट रेल्वे स्थानकांदरम्यान लांबीचा महत्त्वाचा रेल्वे पूल आहे. हा पूल पंचगंगा नदीवर बांधला आहे, जो कासारी, धामणी, कुंबी, तुळशी आणि भोगावती या पाच प्रमुख प्रवाहांच्या संगमाने तयार झाला आहे.राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडणे आणि पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे ही समस्या आणखी वाढणार आहे.कोल्हापूर विभाग आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी पुलावरील धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासन रेल्वे संबंधी निर्णय घेऊ शकते. असे रेल्वे प्रशासनाने सुचित केले आहे.

सर्व जाहिराती एकाच पेजवर पहा, संपर्क साधा…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.