सणासुदीच्या कालावधीत शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत करा – राजेश क्षीरसागर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक…

कोल्हापूर – सणासुदीच्या कालावधीत शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत करा नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. शहरवासीयांना पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा असा सज्जड दम राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला. दिवाळीत अधिकाऱ्यांच “दिवाळ” काढण्याची वेळ येवू देवू नका अशा शब्दात क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली.

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत क्षीरसागर यांनी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जलअभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी, बालिंगा उपसा केंद्र येथील शाहूकालीन पाण्याचे चेंबर ढासळले असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. पाणीपुरवठा व्यवस्था शाहूकालीन असून आजतागायत यास निधी दिला गेलेला नाही. सद्यस्थितीत चेंबरची साफ सफाई करून पाणीपुरवठा सुरुळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सी, डी वॉर्ड मध्ये सद्या पाणीपुरवठा बंद असून, याठिकाणी २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शहराच्या सर्वच भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देत आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. असे असताना शहराच्या पाणीपुरवठा आदी मुलभूत सोयीसुविधांसाठी आवश्यक दुरुस्ती, नूतनीकरणासाठी निधी मागणीचे प्रस्ताव महानगरपालिका सादर का करत नाही? असा सवाल अधिकाऱ्यांना केला.

नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी, नागरिकांना मुबलक पाणी पुरविणे महानगरपालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण, शहरातील पाणीपुरवठा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन सणासुदीच्या काळात माता-भगिनी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत पाणीपुरवठा सुरुळीत होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु करा. आवश्यक वाटल्यास उपसा केंद्राच्या कामाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी मार्ग अवलंबून नागरिकांना पाणीपुरवठा करा. येत्या तीन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे, असा इशारा दिला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, प्रसाद चव्हाण, किशोर घाटगे, उदय भोसले, निलेश हंकारे, सुरेश माने आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.