भाजपच्या चौकटीत राहून त्यांना काम करावे लागेल…
कोल्हापूर – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपच्या उपकारामुळेच पालकमंत्रीपद मिळाले आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. याआधी ते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपवर अतिशय कटू शब्दात टीका करत होते.
![]() |
![]() |
आम्हाला जातीयवादी असल्याचे म्हणत होते, असे प्रतिपादन भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे. मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर घाटगे यांनी हे मत व्यक्त केले आहे. समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, ‘‘मुश्रीफ यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आता त्यांची मनमानी चालणार नाही. भाजपच्या चौकटीत राहून त्यांना काम करावे लागेल.
जेव्हा ही चौकट मोडेल तेव्हा मी त्यांच्यासमोर उभा रहाणार आहे. कागलमध्ये आमच्यात संघर्ष अटळ असून कागलमध्ये स्वराज्य येणे अटळ आहे. ‘जितना बडा संघर्ष होगा, उतनीही बडी जीत होगी. असे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे बोलताना केले.