विनायक जितकर
मारुतीराव जाधव गुरुजी तळाशीकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित…
गारगोटी प्रतिनिधी – काही माणसांचा जन्म समाजातील गोरगरीब आणि सामान्य जनतेचे आश्रु पुसण्यासाठी असतो. लोकहित डोळ्यासमोर ठेवून आयुष्य वेचणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक म्हणे राधानगरी तालुक्यातील समाजवादी विचारसरणीचे जेष्ठ नेते, संत तुकाराम यांच्या गाथेचे निरुपणकार मारुतीराव जाधव गुरूजी असून त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. श्री. जोतीबा भक्त मंडळ व ग्रामस्थ गारगोटी यांचे वतीने आयोजित लोककला शाहीरी महोत्सवादरम्यान पुरस्कार सोहळा व सत्कार समारंभ बोलत बोलत होते.
![]() |
![]() |
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, शाहिरी कला ही महाराष्ट्रांची पारंपरिक लोककला असून आजही जनसामान्या आपली वाटते. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत शाहिरी कला फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून मनोरंजन होत असते. आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरीता सर्जेराव मोरे यांचेवतीने शाहिरी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. तसेच या शाहिरांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित आहेत. सदर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के म्हणाले की मारुतीराव जाधव गुरूजी यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच समाजामध्ये संस्कृती आणि संस्कार टिकून राहिल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना आयोजक व लोककलाकार मानधन समितीचे अध्यक्ष सर्जेराव मोरे म्हणाले की, लोककलेतील एक महत्त्वाचा कलाप्रकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या; शाहिरी या कला प्रकाराचे जतन – संवर्धन व्हावे यासाठी गेली अनेक वर्षापासून श्री जोतिबा भक्त मंडळ व ग्रामस्थ गारगोटी यांचेवतीने लोककला शाहीरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते शहिरांचा सत्कार आणि बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आले.
- मारुतीराव जाधव यांना समाजभूषण पुरस्कार देताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, आमदार प्रकाश आबिटकर, बी. एस. देसाई, के. जी. नांदेकर, नंदकुमार ढेंगे, दत्ताजीराव उगले आदी मान्यवर. यावेळी जेष्ठनेते बी. एस. देसाई अण्णाजी, कोकण केसरी के.जी नांदेकर, भाई आनंदराव आबिटकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, बिद्रीचे माजी संचालक दत्ताजीराव उगले, माजी उपसभापती अरुण जाधव, कल्याणराव निकम, माजी सभापती सुनील निंबाळकर, अंकुशराव चव्हाण, बाजीराव चव्हाण, प्राध्यापक उदय शिंदे अशोक कौलवकर, अरविंद चौगुले, सदाशिव खेगडे, प्राध्यापक आनंद गिरी, पद्माकर कापसे, शाहीर आनंदा चौगुले, मानसिंग तोरसे, कविवर्य सखाराम खोत, आनंदा पाटील, माजी उपसरपंच अरुण शिंदे, बाबासाहेब चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.अतुल कुंभार, आभार श्रीकांत कांबळे यांनी मानले.