विनायक जितकर
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गारगोटी येथे वाहन व कर्ज मंजूरी पत्रांचे वाटप…
गारगोटी – आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आज राधानगरी विधानसभा मतदार संघातील 12 हून अधिक लाभार्थ्यांना फिराता व्यवसाय करण्यासाठी वाहन व 10 हून अधिक लाभार्थ्यांना इतर व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून त्यांच्या वाहन व कर्ज मंजूरी पत्रांचे वाटप कार्यक्रम गारगोटी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
![]() |
![]() |
राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवती आर्थिक सक्षम होत असून राधानगरी विधानसभा मतदार संघातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आबिटकर यांनी यावेळी केले. त्यासाठी लागणारी सर्व मदत संपर्क कार्यालयातून केली जाणार असल्याचे बोलताना सांगितले.
केंद्र व राज्य सरकारच्या स्वतःचे उद्योग व व्यवसाय उभारण्यासाठी अनेक प्रकारच्या कर्ज योजना आहेत. याचा फायदा उचलण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. आजवर चुकीच्या पद्धतीने कर्ज उचलून त्याची परतफेड न झाल्याने अनेक गावांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्याचे धाडस करीत नाहीत. मात्र नव्या पिढीकडे उद्याचे यशस्वी उद्योजक या दृष्टीने पाहून बँकांनीही धाडस करावे आणि लोकांनी ही चांगली संधी समजून नवनवे उद्योग निर्माण करावेत असे आवाहन आमदार आबिटकर यांनी केले. |
या योजनेचे समन्वयक म्हणून काम करणारे प्रविण पाटोळे यांचे विशेष आभार मानत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य आत्मा समिती सदस्य अशोकराव फराकटे, शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, जिल्हा उद्योग अधिकारी संकेत कदम, जिल्हा उद्योग निरीक्षक प्रसाद काटाळे, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब भोपळे, पांगीरे सरपंच मारुती भराडे, बी. एस. माने सर, खानापूर माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच अरुण शिंदे, बसरेवाडी सरपंच संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, बजरंग देसाई, महेश सुतार, राजेंद्र चौगले, अजित चौगले, दिलीप देसाई, दिपक देसाई, सागर शिंदे, प्रशांत भोई, पांडूरंग कांबळे, बाळ देसाई, नंदकुमार सातोस्कर, यांच्यासह प्रमुख मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.