उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिवेशन संपताच सुट्टीच्या दिवशी (शनिवारी) मंत्रालयात उपस्थित राहून नागरिकांच्या पत्रांचा, निवेदनांचा केला निपटारा…
मुंबई – उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या लोकाभिमुख कारभाराचा आणि प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जनतेची कामे रखडता कामा नये व विकासकामांचा तात्काळ निपटारा लागावा आणि कोण कामाचे पत्र घेऊन आले तर दादा भेटले नाहीत असे होता कामा नये व असा गैरसमज जनतेमध्ये जाऊ नये याची काळजी घेणारे अजितदादा पवार अधिवेशन संपताच सुट्टीच्या दिवशीही जनतेच्या कामांचा निपटारा करताना आज मंत्रालयात दिसले.
![]() |
![]() |
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशिरा संपले. मात्र विधानभवनात येऊन भेटता आले नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ वाजताच मंत्रालयात येऊन नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तात्काळ निर्णयांसाठी… त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात.
विधीमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे, निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती हे लक्षात घेऊन अधिवेशन संपताच अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. या निमित्ताने अजितदादा पवारांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा बघायला मिळाला.