भाजपचा नवा डाव,-मतदाराचे महत्त्व कमी करणे: संतोष पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संविधाना बरोबर मतदाराचे महत्त्व कमी करण्याचा भाजपच्या राज्यकर्त्यांचा डाव.———-राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

 सांगली: विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून संविधान मसुदा तयार केला व तो मसुदा 26 नोव्हेंबर 1949 ला राष्ट्रपतीकडे सादर केला तोच दिवस म्हणजे संविधान दिन होय.

या आजच्या दिवशी आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहारअर्पण करून अभिवादन केले व 26/11 या संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या वेळेला  राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमा समोर माहिती दिली की, या आजच्या दिवशी म्हणजेच 26/11/1949 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष व देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान मसुदा सादर केला.  26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी झाली. हा दिवस देशातील काही संघटनांना विशिष्ट काही समाजातील व्यक्तींना व विशेष करून जातीवादी भारतीय जनता पार्टीला एका मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने ही घटना लिहिली हे मान्यच नाही व काही पक्षातील लोकांना या संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्यासाठी व देशातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेले बॉम्बस्फोटातील काही लोकांना वाचवण्यासाठी एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांना मारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्या वेळचे अध्यक्ष अजित डोवाल यांच्या माध्यमातून 26/11/2008 ला मुंबईवर संविधान दिना दिवशीच मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणला व त्यात ते यशस्वी झाले.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आपल्या पवित्र मताचा हक्क मतदाराने बजावला,परंतु तो मतदानाचा बजवलेला हक्क ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून दुसऱ्याला गेला .यावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व नागरिकांना दिलेल्या मतदानाचा हक्क काढून घेण्याचे षडयंत्र सध्याचे भाजपचे राज्यकर्ते करीत आहेत. हे दुर्दैव आहे.यामुळे आपला देश परत एकदा गुलामगिरीत जाईल व गोरगरीब पीडित,वंचित, शोषित, दलित,आदिवासी,भटक्या विभक्ती जाती जमाती मागासवर्गीय नागरिकांना एक धोक्याची घंटा राहील अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.

यावेळेला सर्वांनी घोषणा देऊन बाबासाहेबांनी दिलेल्या पवित्र मताचा अधिकार वाचवण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आणि इथून पुढे बॅलेट पेपर वरच मतदान करायचीअशी शपथ घेतली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.