जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांची एकूण 91.76 टीएमसी इतकी पाणी क्षमता…
कोल्हापूर – जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सहा ऑगस्टपर्यंत प्रमुख धरणातील 15 धरणात 79.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आज अखेर धरणात 8.13 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यावर्षी जिल्ह्यात म्हणावा तसा वळीव असा पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली.
![]() |
![]() |
परिणामी जून महिन्याच्या प्रारंभीच धरणाणांनी तळ घाठला होता. त्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यासह प्रशासनाची ही चिंता वाढली. मात्र जुलैमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांची एकूण 91.76 टीएमसी इतकी पाणी क्षमता आहे यावर्षी सहा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेपर्यंत या प्रमुख 15 धरणात ७९.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवसापर्यंत हा पाणीसाठा 71.72 टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 8.13 टीएमसी पाणीसाठा जास्तीचा आहे यामुळे जिल्ह्याची चिंता मिटली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणापैकी राधानगरी धरण यावर्षी जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या तेरा वर्षात चौथ्यांदा यावर्षी हे धरण भरले आहे. राधानगरी सह कडवी, जंगम हट्टी, चित्री, घटप्रभा, जा, कोदे ही 7 धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. वारणा, दूधगंगा,कुंभी, कासारी आणि पाटगाव ही धरणे ही 80 टक्के होऊन अधिक भरले आहेत जिल्ह्यातील सर्व धरणे सरासरी 86.36% भरले आहेत गतवर्षी हीच टक्केवारी 77.50% इतकी होती.