विनायक जितकर
आमदार प्रकाश आबिटकर गटाचे सागर शिंदे गारगोटीच्या उपसरपंच पदी विराजमान…
गारगोटी प्रतिनिधी – राजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात परंतु गाव संघटित असेल तर गावाचा विकास होणे थांबत नाही. गारगोटी गावच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार प्रकाश आबिटकर सैदैव तत्पर आहे. यामुळे मागील आमदार साहेबांची सत्ता गारगोटी शहरात असताना कोट्यावधी रुपयांची कामे मार्गी लागली असून आता येणाऱ्या 5 वर्षात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून गारगोटी शहराचा सर्वांगीण विकास कठिबध्द असल्याचे नुतन उपसरपंच सागर शिंदे म्हणाले.
गारगोटी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये आमदार प्रकाश आबिटकर व समविचारी आघाडीचे 17 पैकी 13 सदस्य निवडून आले आहेत. आज गारगोटी ग्रामपंचायतीची उपसरपंच निवड होती. यामध्ये सागर आनंदराव शिंदे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नुतन उपसरपंच सागर शिंदे, नुतन सदस्य प्रशांत भोई, भरत शेटके, राहूल चौगले, संदीप देसाई, राहूल जाधव, सदस्या लता चव्हाण, रुपाली राऊत, संध्या कुपटे, स्मिता पिसे, मेघा भोसले, किरण कल्याणकर, पायल पावले आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले की, ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातुनच मार्गी लागत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा कणा असतो. या ठिकाणी येणार्याा जनतेला न्याय देण्याची भूमिका उपसरपंच, सदस्यांनी ठेवून अधिक विकासात्मक कामे करावीत. मागील 5 वर्षात गारगोटी शहराचा विकास खुंटलेला आहे. यामुळे गारगोटी शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणात त्रासली असून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून गारगोटी शहरातील उर्वरीत सर्व विकास कामे मार्गी लावूया असे ते म्हणाले.
यावेळी बोलतना माजी उपसरपंच सर्जेराव देसाई म्हणाले की, नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला शोभेल असे काम करावे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याचे काम करीत राहावे. आपले गाव आदर्श व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे म्हणाले.
यावेळी अंकुश चव्हाण, भाजपा नेते अलखेश कांदळकर, मौनी विद्यापीठ प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, राजू काझी, शामराव इंदूलकर, विजयराव आबिटकर, शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत, माजी उपसरपंच अरुण शिंदे, व्हि. जे. कदम, चंद्रकांत गोजारे, अल्ताफ बागवान, दिपक देसाई, सचिन देसाई, मिलिंद पांगीरेकर, बंडा भाट, माजी ग्रा.पं.सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, अजित चौगले, महेश सुतार, राजू चिले, अजित देसाई, चंद्रकांत गोरे यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. उदय शिंदे यांनी प्रस्ताविक केले तर आभार विजय सारंग यांनी मानले.