संयुक्त राष्ट्र संघाचा युद्धबंदीचा प्रस्ताव योग्यच, परंतु हमास सारख्या आतंकवाद्यांचे काय?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

हमास जोपर्यंत शरणागती पत्करत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही.

युद्ध थांबायला हवे, कोणत्याही युद्धामुळे कोणालाच फायदा झालेला नाही उलट नुकसानच झाले आहे ही बाब आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. एकीकडे पॅलेस्टिनींच्या जिवन-मरणाचा प्रश्न तर दुसरीकडे हमासच्या इस्रायलवरील कायरतापुर्वक हल्ल्याने नेतन्याहू हमासला मिटविण्याची शपथ घेतली आहे. नेतन्याहू म्हणतात की युद्ध विराम स्वीकारने म्हणजे शरणागती पत्करने हमास जोपर्यंत शरणागती पत्करत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही असे स्पष्ट संकेत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांला दिले आहेत. जगात आतंकवाद ही विकासाच्या दृष्टीकोनातून व मानवतेच्या दृष्टिकोनातून लागलेली मोठी किड आहे. याला सर्वप्रथम संपुष्टात आणण्याचे काम संयुक्त राष्ट्र संघाने करायला पाहिजे व आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या देशांच्या मुसक्या आवळायला हव्यात.

आज इस्रायल गाझावर का हल्ले करीत आहे याचा अभ्यास संयुक्त राष्ट्र संघाने करायला पाहिजे.कारण हमास आतंकवाद्यांनी इस्रायलवर अचानक ७ ऑक्टोबरला पाच हजार मिसाईल डागले त्यातील चोविसशे मिसाईल इस्रायलच्या अनेक भागात पडले व सव्वीसशे मिसाईल इस्रायलने डीस्ट्राय केले यात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला. जर इस्रायलवर संपूर्ण पाच हजार मिसाईल पडले असते तर इस्रायलवर नेस्तनाबूत झाला असता. यावर सुध्दा संयुक्त राष्ट्र संघाने गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादाविरुद्ध स्पष्ट भुमिका घेवून ठोस संदेश देण्याची गरज आहे.कोणताही दहशतवाद संपूर्ण जगाला हानिकारकच आहे. याकरीता जगाने दहशतवादी कृत्यांचे समर्थन करणाऱ्यां देशांचा जाहीर निषेध करायला हवा व यावर शिक्कामोर्तब संयुक्त राष्ट्रांनी करायला पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघाने हे लक्षात ठेवायला हवे की गाझा पट्टीत सुरू असलेले इस्रायलचे हल्ल्याना अमानुष नरसंहार म्हणता येणार नाही. कारण आजही गाझातील सुरूंगामध्ये हजारो हमास आतंकवादी लपलेले आहेत सोबतच मिस्त्र मधील आतंकवादी संघटना मुस्लिम ब्रदरहुड, लेबनॉन मधील हिजबुल्ला, सीरियामधील आय. एस. आय. एस. (आलं नुसरा फ्रंट अलकायदा) व इस्रायलच्या नजीकच्या गाझा मधील हमास व इस्लामिक जिहाद या संघटना इस्रायलवर आताही हल्ले करीतच आहेत किंवा करण्याच्या तयारीत आहे व त्याच्या मदतीला अनेक आतंकवादी संघटना व देश सक्रिय भुमिका बजावुन इस्रायलला संपविण्याचा संकल्प केल्याचे दिसून येते. यावरही संयुक्त राष्ट्र संघाने नजर टाकण्याची गरज आहे.

  • एकीकडे तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये हजारो लोकांनी लाल झेंडे घेऊन इस्रायलच्या हल्याचा निषेध केला. यावेळी तुर्कीचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन म्हणाले की इस्रायल हा वर्चस्ववादी देश आहे. हमास हा दहशतवादी गट नसुन ते स्वतंत्र सैनिक आहेत यावरून स्पष्ट होते की तुर्की आतंकवाद्यांना व आतंवादी संघटनांना खुली मदत करीत आहे.त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या निशाण्यावर सर्वप्रथम आतंवादी संघटना व त्यांचे मदतगार देश का येत नाही? याचाही विचार संयुक्त राष्ट्र संघाने करण्याची गरज आहे. आजही हमास आतंकवादी इस्रायलची राजधानी तेल अविव वर मोठ्या प्रमाणात हल्ले करीतच आहे. या हल्ल्यांना सुध्दा संयुक्त राष्ट्रांनी विसरू नये असे मला वाटते. आजही इस्रायलमध्ये अनेक नागरिक जखमी अवस्थेत आहेत.त्यामुळे कोणतेही युद्ध असो ते विनाशाकडे नेणारेच असते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी व संयुक्त राष्ट्र संघटनेच्या देशांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की इस्रायलवर पहिला हल्ला कोणी केला. ज्यानी पहिला हल्ला केला तोच हत्यांचा मुख्य दोषी आहे. त्यामुळे इस्रायलच्या निष्पाप लोकांचा बळी हमास आतंकवाद्यांनी घेतला. त्यामुळे इस्रायलने शपथ घेतली आहे की हमासला संपविल्याशिवाय स्वस्त बसनार नाही. याकरीता संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही बाजूंचे गांभिर्य लक्षात घेतले पाहिजे.

गाझा पट्टीत सुरू असलेला अमानुष नरसंहार थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मानवतावादी दृष्टिकोनातून युद्धबंदीसाठी मांडलेला ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र ब्रिटन, कॅनडा, जर्मनीसह ४५ देश मतदानापासून दूर रहाले यात भारताचाही समावेश आहे. परंतु भारताने मतदानापासून दूर राहण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देतांना भारताने सांगितले की या ठरावात हमासचा उल्लेख नाही आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादाविरुद्ध स्पष्ट संदेश देण्याची गरज आहे. कोणताही दहशतवाद हानिकारक आहे त्यामुळे दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रांनी करायला हवे.कारण हमासने इस्रायलवर हल्ला करून मोठी जखम केली आहे व त्यावर मीठ चोळण्याचे शेजारच्या आतंवादी संघटना व संघटनांचे मदतगार इराण, तुर्की सारखे अनेक देश करीत आहे.यावरसुध्दा संयुक्त राष्ट्र संघाने लगाम कसायला हवी. सध्या हमास-इस्त्रायल संघर्ष सिमित रहाले नसुन याचा परिणाम भारतावर सुध्दा झाला आहे. कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्यू दंडाची (फाशीची) शिक्षा ठोठावली आहे. कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. परंतु महत्वाचे म्हणजे कतार हा हमास आतंकवादी संघटनेचा हीमायती देश आहे. अशा परिस्थितीत हमास आतंकवाद्यांच्या विरोधात भारताने इस्रायलला खुले समर्थन केले आहे. त्यामुळे कतार आगबबुला झालेला आहे व भारतीय आठ नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. फाशीची रद्द करण्यासाठी भारताचे कुटनिती प्रयत्न सुरू आहेत. आतंकवाद्यांचा सफाया व्हावा व युद्ध लवकरात लवकर थांबावे हिच अपेक्षा.

लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.