परदेशातले नियम पाळतात, मग भारतात का नाही; जनजागृतीची माेठी गरजः डॉ. रविंद्रकुमार सिंगल

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काेल्हापूर- सध्या नव्या तत्रज्ञानांचा वापर करून अत्याधुनिक, प्रशस्त असे रस्ते बनविण्यात येत आहेत. हे रस्ते सुखकर प्रवास हाेण्यासाठी असले तरी वाहनचालकांनी देखिल स्वतःची स्वयंशिस्त, वेगावर मर्यादा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जेव्हा आपण परदेशातील रस्त्यांचे काैतुक करताे,बिनचूक वाहन चालविताे, तिखे नियमांचे पालन करताे, तर मग भारतात, महाराष्ट्रात नियमांचे पालन का करत नाही,? असा सवाल करत, महाराष्ट्रात गुन्हेगारी वृत्तापेक्षा वाहनांचे अपघात हाेऊन मृत्यूंची हाेणारी संख्या अधिकाधिक आहे. महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, साेलापूर, अहमदनगर, आणि पुणे ग्रामीण येथे वाहनांच्या अपघातांची संख्या माेठी आहे. महामार्ग, बांधकाम विभाग, कार्पाेरेशन, जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असून यात सुधारणा करून अपघातांची संख्या कशी कमी करता येईल, यासाठी आता विशेष प्रयत्न केले जात आहे. असे मत राज्याचे अप्पर पाेलीस महासंचालक (वाहतूक) चे डॉ. रविंद्रकुमार सिंगल(आयपीएस) यांनी व्यक्त केले

उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी व अपघातस्थळी तातडीचे मदत करणारे मृत्युंजय दुत यांचा यावेळी, डॉक्टर सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सिंगल हे आयाेजित काेल्हापूर, सांगली, सातारा दाैऱ्यावर रस्ता सुरक्षा व उपाययाेजना संवाद २०२३ या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी सिंगल यांनी भेटी दरम्यान ब्लॅक स्पॉट ची माहिती घेत जिल्हाधिकारी, आरटीओ. बांधकाम विभाग, आराेग्य विभाग, तसेच कार्पारेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सिंगल यांच्याहस्ते यंदाच्या वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या वाहतूक शाखा पाेलीस आणि मृत्यूंजय दूत यांचा  विशेष सत्कार करण्यात आला. महामार्ग पोलीस मदत केंद्र उजळाईवाडी कोल्हापूर यांनी, रस्ता सुरक्षा उपाय योजना संवाद कोल्हापूर येथील ,गोकुळ शिरगाव मध्ये आयोजित केला हाेता. यावेळी महामार्ग पाेलीस अधीक्षक लता फड, काेल्हापूर महामार्गचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक  सत्यजित घुले, भारत पाटील यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, वाहतूक शाखेचे हवालदार उपस्थित हाेते.

डॉ श्री रवींद्रकुमार सिंगल ( IPS),

सिंगल मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की,  राज्यात ३६०६ मृत्यूंजय दूत कार्यरत आहेत. त्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळताच तत्काळ मदत करण्याचे व उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीमुळे, सहकार्यामुळेच अनेकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे मृत्यूंजयदुताची भूमिका महामार्गवर खूप माेलाची आहे. मात्र अपघात हाेऊच नयेत, यासाठी प्रत्येक व्यक्तीने, वाहनचालकांनी स्वयशिस्त बाळगणे, नियमांचे पालन, सक्तीचे हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे, ते आपले कर्तव्य च आहे असून समजूत, स्वतः जागृक राहिले पाहिजे. आपलेच अनुकरण आपली मुलंही करत असतात. त्यामुळे इतरांच्यात जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया,  असे आवाहन सिंगल यांनी केले.  यावेळी रविंद्रकुमार सिंगल पाेलीस अधिक्षक फड यांच्या प्रमुख उपस्थितीत उजळावाई येथे वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी सिंगल यांनी महामार्ग कार्यालयाच्या स्वच्छतेबद्दल  व तेथील परिसर सुंदर असल्याचे काैतुक करते. सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यावर काैतुकाची थाप मारली.

भारतात व महाराष्ट्रात नव्या टेक्नॉलॉजीचे सुंदर रस्ते होत आहेत. अशाचवेळी अपघातांची मालिकाही वाढली आहे. पण हे अपघात का हाेतात? वाहन मर्मयादा किती असावी, स्वतःच्या संरक्षणासाठी अपघाताच्या नियमांचे कसे पालन करावे,  याची माहिती प्रत्येकाला असायलाच हवी. अनेकदा पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक आणि वेग मर्यादा न पाळणे हे देखील एक अपघाताचं मोठे कारण समोर आलेल आहे. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण व्यवस्थित करणे गरजेचे आहे परदेशामध्ये आपण वाहतुकीची नियम पाळतो तर भारतात काळजीपूर्वक वाहनांचे नियम का पाळत नाही .हा एक संशोधनाचा विषय आहे. सिंगापूर सारख्या देशांमध्ये रस्त्यावर पोलीस देखील दिसत नाही. तरीही तिथे स्वयंशिस्तीने वाहन चालवली जातात. मग आपणच आपल्या देशात स्वयंशिस्त अवलंबली. नियमच पाळले तर पाेलिसांच्यावरील ताण कमी पडेल.  या सर्वांची जनजागृती करण्यासाठी  महामार्ग विभागाचे अन्य विभागाशी संवाद , समन्वय साधून कायमस्वरुपी ताेडगा काढण्यात येत आहे. अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल

काेल्हापूर उजळाईवाडी, महामार्गचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक सत्यजीत घुले, भारत पाटील, यांच्यासह कर्माचारी वर्गाने अंबाईबाची मुर्ती देऊन रविंद्रकुमार सिंगल यंचा सत्कार करण्यात आला.

अपघातातील मृतांची संख्या कमी हाेण्यासाठी, ब्लंँक स्पाँट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आरटीओ यांच्यासोबत सातत्याने बैठका, उपाययाेजना सुरू आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. मात्र,   समन्वयाच्या अभावी काही मर्यादा येत असून, त्यावरही चर्चा करून तातडीने मार्ग काढण्यात आलेत, असेही सिंगल यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये अपघात कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने त्यात यश आले आहे, ताेच पँटर्न अन्य जिल्ह्यात राबविण्याचा मानस असल्याचे सिंगल शेवटी म्हणाले. यावेळी अन्य काही उपाययाेजना असतील तर थेट आमच्या अधिकाऱ्यांजवळ, सूचवावेत असेही आवाहन  करत, अधिकारी, कर्मचारी यांना अपघात झाल्यानंतर आधी संमजस्याची भूमिका घेऊन अपघातग्रस्तांना तातडीची मदत करा अशा सूचना सिंगल यांनी केल्या. 

महाराष्ट्रामध्ये 3,606 मृत्यूंजय दूत आहेत ,हे अपघात. घडलेल्या ठिकाणी त्वरित पोचून गोल्डन आवर्स मध्ये दवाखान्यात, अपघातग्रस्तांना नेतात. यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी हाेत आहे .अशा मृत्युंजय दुतांना, मी सलाम करतो .असे काम करण्यासाठी मोठे धाडस लागते ,आजपर्यंत 1600 लोकांचे प्राण मृत्युंजय दूतांनी वाचवले आहेत .ते म्हणाले मुख्यतः त्याच वेळी, अपघाती व्यक्तीस दवाखान्यात पोहोचवल्यास ,त्याच्यावर त्वरित उपचार चालू होतो,आणि ती वेळ वाचवण्याची जास्त महत्वाची ठरते. खुद्द न्यायालयाने देखिल मृत्यूजंयदूत जेव्हा मदत करत असतील तेव्हा त्यांना अडथळा येऊ नये असे सुचित केले आहे.
2022   मध्ये  महाराष्ट्रामध्ये एकूण 15,224 लोक अपघातात मृत्यु मुखी पडले , भारतात एकूण 1,100,53 अपघातात मयत झाले.  अपघाता मध्ये महाराष्ट्रात पुणे जिल्हाचे प्रमाण जास्त आहे, त्यानंतर नाशिक जिल्हा ,अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा,जळगाव जिल्हा.  आपण सर्व मिळून अपघातग्रस्तांना वाचवूया .अपघात होण्यापासून कसे वाचता येईल, हा जास्तीत जास्त प्रयत्न पण करूया ,हेल्मेट ,सीट बेल्ट वेग मर्यादा, ब्लिंकर्स, झेब्रा क्रॉसिंग, इत्यादी बोर्ड लावून सामाजिक संस्था तसेच एमआयडीसी सारख्या नी ही पुढे येऊन सहकार्य करावे. असे आव्हान सिंगल यांनी केले.

 

सांगलीतील रविंद्रकुमार सिंगल यांचे कार्य व त्यानंतर सुमारे तब्बल २५ वर्षानंतर काेल्हापूर येथे भेट झाली. यावेळी त्यांचा छाेटासा सत्कार करण्याची संधी मिळाली. डाँ. रविंद्रकुमार सिंगल व शेखर धाेंगडे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.