काेल्हापूर- सध्या नव्या तत्रज्ञानांचा वापर करून अत्याधुनिक, प्रशस्त असे रस्ते बनविण्यात येत आहेत. हे रस्ते सुखकर प्रवास हाेण्यासाठी असले तरी वाहनचालकांनी देखिल स्वतःची स्वयंशिस्त, वेगावर मर्यादा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जेव्हा आपण परदेशातील रस्त्यांचे काैतुक करताे,बिनचूक वाहन चालविताे, तिखे नियमांचे पालन करताे, तर मग भारतात, महाराष्ट्रात नियमांचे पालन का करत नाही,? असा सवाल करत, महाराष्ट्रात गुन्हेगारी वृत्तापेक्षा वाहनांचे अपघात हाेऊन मृत्यूंची हाेणारी संख्या अधिकाधिक आहे. महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, साेलापूर, अहमदनगर, आणि पुणे ग्रामीण येथे वाहनांच्या अपघातांची संख्या माेठी आहे. महामार्ग, बांधकाम विभाग, कार्पाेरेशन, जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असून यात सुधारणा करून अपघातांची संख्या कशी कमी करता येईल, यासाठी आता विशेष प्रयत्न केले जात आहे. असे मत राज्याचे अप्पर पाेलीस महासंचालक (वाहतूक) चे डॉ. रविंद्रकुमार सिंगल(आयपीएस) यांनी व्यक्त केले

सिंगल हे आयाेजित काेल्हापूर, सांगली, सातारा दाैऱ्यावर रस्ता सुरक्षा व उपाययाेजना संवाद २०२३ या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी सिंगल यांनी भेटी दरम्यान ब्लॅक स्पॉट ची माहिती घेत जिल्हाधिकारी, आरटीओ. बांधकाम विभाग, आराेग्य विभाग, तसेच कार्पारेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सिंगल यांच्याहस्ते यंदाच्या वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या वाहतूक शाखा पाेलीस आणि मृत्यूंजय दूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महामार्ग पोलीस मदत केंद्र उजळाईवाडी कोल्हापूर यांनी, रस्ता सुरक्षा उपाय योजना संवाद कोल्हापूर येथील ,गोकुळ शिरगाव मध्ये आयोजित केला हाेता. यावेळी महामार्ग पाेलीस अधीक्षक लता फड, काेल्हापूर महामार्गचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक सत्यजित घुले, भारत पाटील यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, वाहतूक शाखेचे हवालदार उपस्थित हाेते.

सिंगल मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, राज्यात ३६०६ मृत्यूंजय दूत कार्यरत आहेत. त्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळताच तत्काळ मदत करण्याचे व उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीमुळे, सहकार्यामुळेच अनेकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे मृत्यूंजयदुताची भूमिका महामार्गवर खूप माेलाची आहे. मात्र अपघात हाेऊच नयेत, यासाठी प्रत्येक व्यक्तीने, वाहनचालकांनी स्वयशिस्त बाळगणे, नियमांचे पालन, सक्तीचे हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे, ते आपले कर्तव्य च आहे असून समजूत, स्वतः जागृक राहिले पाहिजे. आपलेच अनुकरण आपली मुलंही करत असतात. त्यामुळे इतरांच्यात जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन सिंगल यांनी केले. यावेळी रविंद्रकुमार सिंगल पाेलीस अधिक्षक फड यांच्या प्रमुख उपस्थितीत उजळावाई येथे वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी सिंगल यांनी महामार्ग कार्यालयाच्या स्वच्छतेबद्दल व तेथील परिसर सुंदर असल्याचे काैतुक करते. सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यावर काैतुकाची थाप मारली.

अपघातातील मृतांची संख्या कमी हाेण्यासाठी, ब्लंँक स्पाँट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आरटीओ यांच्यासोबत सातत्याने बैठका, उपाययाेजना सुरू आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. मात्र, समन्वयाच्या अभावी काही मर्यादा येत असून, त्यावरही चर्चा करून तातडीने मार्ग काढण्यात आलेत, असेही सिंगल यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये अपघात कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने त्यात यश आले आहे, ताेच पँटर्न अन्य जिल्ह्यात राबविण्याचा मानस असल्याचे सिंगल शेवटी म्हणाले. यावेळी अन्य काही उपाययाेजना असतील तर थेट आमच्या अधिकाऱ्यांजवळ, सूचवावेत असेही आवाहन करत, अधिकारी, कर्मचारी यांना अपघात झाल्यानंतर आधी संमजस्याची भूमिका घेऊन अपघातग्रस्तांना तातडीची मदत करा अशा सूचना सिंगल यांनी केल्या.