वन्यजीव विभागाकडून हुल्लडबाजांवर होणार कडक कारवाई…
राधानगरी प्रतिनिधी (विजय बकरे) – महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य दिनांक 30 व 31 डिसेंबर यादोन दिवस वर्षाखेर असल्याने पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दाजीपूर अभयारण्या कडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गवा रेड्यासाठी दाजीपूर अभयारण्यामध्ये पट्टेरी वाघ गवा रेडा असे अनेक प्राणी या अभयारण्यामध्ये असल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भेट देत असतात.
शासनाने 31 डिसेंबर वर्ष अखेर असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन या अभयारण्यामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणारे व स्टोरी बॉक्स लावून नाच करणे हुल्लडबाजी व प्लास्टिक कचरा करणे अशा गोष्टी पर्यटक करत असल्याने त्यासाठी शासनाने दाजीपूर अभयारण्य दिनांक 30 व 31 डिसेंबर या दोन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे जर पर्यटक या अभयारण्यामध्ये सापडल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती दाजीपूर अभयारण्य वन्यजीव विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.