महाराष्ट्राच्या प्रगतीत जेवढे योगदान सरकारचे तेवढेच सहकाराचे -प्रा. मधुकर पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
 

केडीसीसी बँकेत ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त व्याख्यान, उत्तम नेतृत्व आणि पारदर्शक कारभार यामुळे सहकार गतिमान होईलकोल्हापूर: महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचा वाटा सिंहाचा आहे. किंबहुना; महाराष्ट्राच्या प्रगतीत जेवढे योगदान सरकारचे आहे, तेवढेच योगदान सहकाराचेही आहे. उत्तम नेतृत्व आणि पारदर्शक कारभार यामुळे सहकार चळवळ गतिमान होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी केले. केडीसीसी बँकेच्या सभागृहामध्ये ७० व्याअखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे जेष्ठ संचालक बाबासाहेब पाटील’ आसुर्लेकर होते.

व्याख्यानात पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलण्याचं काम सहकार चळवळीने केले. आज महाराष्ट्राच्या मार्गावरती दिसणारे साखर कारखाने, सूतगिरण्या, पतसंस्था बँका ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाची नांदी आहे.ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आलेखामध्ये सहकारी चळवळीचा नंबर फार वरच्यास्थानी आहे. १९४८ ला विखे पाटील यांनी सुरू केलेला सहकार तत्वावरील पहिला साखर कारखाना असेल किंवा सूतगिरणी या सगळ्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने रोजगार -उद्योग व्यवसाय बळकट होण्यासाठी मदत झाली. अशी सहकार चळवळ पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्यासाठी आणि खाजगीकरणाचे आक्रमक रोखण्यासाठी गावागावा सहकारी चळवळीचे महत्त्व समजून सांगण्यास गरजेचे आहे. योग्य नेतृत्व आणि नियोजनामुळे सहकार समृद्ध होईल. सहकार समृद्धीसाठी सर्वांचा सहभाग मोलाचा आहे.

७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त केडीसीसी बँकेच्या सभागृहात शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा. मधुकर पाटील यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी. जी. एम. शिंदे, जिल्हा सहकार विकास अधिकारी बी. जी. साळोखे इतर प्रमुख.

सरकार आणि सहकार……!
पाटील म्हणाले, कोणत्याही राज्याच्या विकासाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारची असते. महाराष्ट्रात सहकार नसता तर महाराष्ट्र समृद्ध झाला नसता. राज्याच्या प्रगतीत आणि विकासात्मक वाटचालीत जेवढे योगदान सरकारचे तेवढेच योगदान सहकाराचे आहे.

स्वागत व प्रास्ताविक बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी केले. आभार जिल्हा सहकार विकास अधिकारी बी. जी. साळोखे यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.