सह्याद्री धावणार! दिपावलीपूर्वीच प्रवाशांना गाेड बातमी.. रेल्वे प्रशासनाचा निर्णय झाला, वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दिपावलीच्या शुभमुहुर्तापूर्वीच सह्याद्री पुण्यापर्यंत धावणार!

विनायक जीतकर- कोल्हापूर

कोरोनाच्या संकटकाळात बंद असलेली सह्याद्री आता पुन्हा धावण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दिपावलीच्या निमित्ताने असंख्य प्रवाशांना ही गोड बातमी मिळण्याची अधिक शक्यता रेल्वेच्या सूत्रांकडून मिळत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात १२ डब्यांची सह्याद्री पुणेपर्यंत सोडण्यासाठीचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे.

पाच नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्सप्रेस सुरू होणार, तुर्तास कोल्हापूर – पुणे मार्गावर सह्याद्री एक्सप्रेस धावणार,

खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्रालय तसंच रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत पाठपुरावा केला. 

५ नोव्हेंबर पासून पुन्हा सह्याद्री एक्सप्रेस सुरू होत आहे. ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत, कोल्हापूरातून रात्री ११.३० वाजता सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस, दुसर्‍या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पुण्यात पोचेल. तर पुण्याहून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस, दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल.

रेल्वे प्रवाशी संघटना, प्रेस क्लब, मिडीया असोशिएशन आँफ इंडिया, डिजीटल मिडीया यासारख्या पत्रकारांच्या संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक, राजकीय नेत्यांची मागणी होती. याला खासदार धनंजय महाडीक यांनी रेल्वे मंत्री यांच्याकडे सतत मागणी करत पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर महाडिक यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, ही सह्याद्री रेल्वे पुण्यापर्यंत धावेल, असा विश्वास रेल्वे प्रवाशी संघटनेचे शिवनाथ बियानी यांनी वर्तविला आहे..

सह्याद्री सुरु हाेण्यासाठी काेल्हापूरच्या विविध संघटनेप्रमाणेच. पिंपरी चिचवड येथील रेल्वे प्रवाशी संघाचे इकबाल मुलानी यांनी देखिल विशेष प्रयत्न केलेत. त्यांनी राजकीय नेते. रेल्वे मंत्री, रेल्वे प्रशासनाला वारंवार सह्राद्री सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. मागणी मान्य हाेण्यासाठी निवेदन, चर्चा करून सह्याद्री का सुरु व्हावी,याची प्रवाशांसाठी कितपत गरज आहे, हे इकबाल मुलानी यांनी पटवून दिले. 

शिवनाथ बियाणी- रेल्वे प्रवाशी संघटना

कोरोनाच्या काळात सह्याद्री एक्सप्रेस बंद असल्याने असंख्य प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबरच, रेल्वेला देखिल मोठा तोटा सहन करावा लागत होता. सह्याद्री ही पुणे-मुंबईच्या असंख्य प्रवाशांना सोयीची रेल्वे आहे. रात्री १० ५० ला सुटून ती पहाटे मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईत एका दिवसात जाऊन परत येणाऱ्यांची तसेच नोकरदार, उद्योजक, व्यापारी यांच्यासाठी सह्याद्री रेल्वे महत्वाची ठरत होती. मात्र कोरोनाच्या संकट काळात सह्याद्री बंद केल्याने ती पूर्ववत सुरु व्हावी यासाठी अनेकांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. मात्र अखेर या मागणीला यश आले असून, अवघ्य काही दिवसातच म्हणजे दिपावलीच्या शुभमुहुर्तावर रेल्वे सुरु होणार असल्याची गोड बातमी मिळेल असे रेल्वे प्रवाशी संघटनेचे शिवनाथ बियाणी म्हणाले. नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर पुणे मार्गावर धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे खासदार धनंजय महाडीक म्हणाले.  प्रवाशांच्या साेयीसाठी ही अत्यंत महत्वाची रेल्वे मानली जाते. ती भविष्यात लवकरच मुंबईपर्यंत देखील पूर्ववत करू असा विश्वास खासदार धनंजय महाडीक यांनी दिला. 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.