शासकीय रुग्णालयातील रूग्णांचे मृत्यूचे तांडव पहाता महाराष्ट्राची आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नांदेड आणि संभाजीनगर शासकीय रुग्णालयातील रूग्णांचे मृत्यूचे तांडव पहाता महाराष्ट्राची आरोग्य सेवा कोलमडली असल्याचे दिसून येते….

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयातील रूग्णांच्या मृत्यूची घटना अंगावर शहारे येणारी आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयाची खरी अवस्था काय आहे ही बाब राज्याच्या १३ कोटी जनतेला चांगल्याच प्रकारे ग्यात आहे. परंतु आता महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालये मृत्यूचे माहेरघर बनले की काय असे वाटत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांचा ढींढोरा पीटला आणि सर्वांना सरकारमार्फत चांगल्याप्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येईल असेही सांगितले. परंतु आज देशाच्या १४० कोटी जनतेच्या डोळ्यांसमोर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  आणि छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूचा थैमान सुरू आहे ही अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब आहे.

ऐकीकडे बिच्चारे रूग्ण दगावत आहे आणि दुसरीकडे राजकीय पुढारी राजकारण करण्यात मग्न असल्याचे दिसून येते. शासकीय रूग्णांलयात सरकारने योग्य सुविधा प्रदान केल्या असत्या तर राज्यात खाजगी रुग्णालयांचा बाजार आणि व्यापार लागला नसता. गोरगरीबांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शासकीय रुग्णालयात धाव घेतात. परंतु आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयावरून असे लक्षात येते की हे रूग्णांलय नसुन मृत्यू खाणा आहे की काय असे सर्वसामान्यांना वाटत आहे. अजुनही नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यूचे सत्र थांबता थांबेनासे झाले आहे गेल्या ३ दिवसांत तब्बल २२ बालकांसह ४८ मृत्यू व २५ पेक्षा जास्त बालके अद्यापही अत्यवस्थ आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत तब्बल १८ रूग्णांचा मृत्यू झाला. या संपूर्ण बाबी सरकार मार्फत रूग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोईसुविधांमुळे निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

सरकार पाच लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार असे सांगत असतांनाच, प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयात औषधांच्या अभावामुळे व तुटवड्यामुळे रूग्ण दगावतात आहे हे सरकारला का दिसत नाही? या संपूर्ण घटनांवरून असे दिसून येते की सरकारच्या सुविधा फक्त कागदावरच आहे की काय असे वाटत आहे.त्याचे प्रायचीत्य सर्वसामान्यांना व गरीबांना भोगावे लागत आहे. कुठे गेली शासकीय यंत्रणा, राज्यात  रूग्णांसाठी अनेक योजना मग सरकारी रूग्णांलयात मृत्यूचे तांडव का?या संपूर्ण बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार करून राज्यातील संपूर्ण शासकीय रूग्णालयांना अत्याधुनिक सुविधा पुर्ववत केल्या पाहिजेत जेणे करून रूग्णांचे प्राण वाचेल व गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ येवू नये अशा पध्दतीचे कार्य सरकारने युध्दपातळीवर करायला हवे. राज्यात नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय किंवा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ही पहिलीच घटना नसुन राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे व गैरसोयीमुळे अनेक रूग्ण दगावले आहेत.

  • या संपूर्ण घटनांची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब शासकीय रुग्णालयांना रूग्णांच्या दृष्टीकोनातु योग्य पावले उचलुन संपूर्ण सुविधां रूग्णांपर्यंत कशा पोहचविता येईल या उद्देशाने पावले उचलली पाहिजेत. आता शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत बघ्याची भूमिका नकोच किंवा “मला पहा आणि फुले वाहा” अशी भूमिका नको. कारण प्रत्येकांचे प्राण मोलाचे असतात. कोणाचे प्राण जर चुकांमुळे जात असेल तर ही अत्यंत गंभीर आणि जिव्हाळी लागणारी बाब आहे आणि आज जे आपण शासकीय रुग्णालयातील मृत्यूचे तांडव पाहत आहे ते प्रशासनाच्या व सरकारच्या चुकांमुळे निर्माण झालेले मृत्यू तांडव आहे. नागपूर शहरातील मेडिकल आणि मेयो या दोन शासकीय रुग्णालयांमध्ये ७२ तासांत ६३ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. यातील ४३ मृत्यू मेडिकलमध्ये तर २० मृत्यू मेयोमध्ये झाले असल्याची माहिती समोर आली आहे.परंतु यात खाजगी रुग्णालयातुन मेडिकलमध्ये रेफर केलेल्या ३४ रूग्णांचा मृत्यूमध्ये समावेश आहे.त्यामुळे सरकारने आता खाजगी रुग्णालयांवर सुध्दा कठोर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत खाजगी रुग्णालयांची मनमानी सुरू असुन रूग्णांजवळुन मोठ्या प्रमाणात अवाढव्य फी आकारली जाते.

लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.