एस. टी. बस थांब्यावरील हॉटेल, मॉल व ढाब्यावर ३० रुपयात नाश्ता मिळावा – ‘मीडिया अशोशिएशन ऑफ इंडिया’

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बस, हॉटेल, मॉल व ढाब्यावर दर्शनी भागात स्टिकर चिटकवून प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी…

मुंबई – ‘मीडिया अशोशिएशन ऑफ इंडिया’ च्या वतीने एसटी बस थांब्यावरील हॉटेल, मॉल व ढाब्यावर ३० रुपयात नाश्ता मिळणेबाबत निवेदन देण्यात आले. मुंबई सेंट्रल एस टी बस आगाराचे नव्याने पद भार स्वीकारलेले विपीनवार यांना सह. सचिव चेतन काशीकर, अनिल चासकर आणि वैजयंता मोरे यांनी निवेदन दिल्यानंतर एस. टी. चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विपीनवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

आपण नेहमीच एसटीने प्रवास करत असतो. मात्र एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना मिळणाऱ्या अनेक सोयी सुविधा चा लाभ आपण घेत नसतो. किंवा त्याची माहिती सुद्धा आपल्याला नसते. नेमका याचाच फायदा एसटी प्रशासनाचा योजना राबवणारे किंवा उपक्रम राबवणारे चालक-मालक घेत असतात. असाच एक मोठा फायदा गेल्या अनेक वर्षापासून एसटी प्रशासन विभागामार्फत सुरू आहे मात्र, त्याची पुरेशी माहिती बहुतांशी प्रवाशांपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळेच ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच पत्रकारांची असलेली राष्ट्रीय संघटना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने या सर्व प्रकरणाची सत्यता तपासून, सर्व प्रवाशांपर्यंत एका चांगल्या योजनेची माहिती उलटली आहे. याबाबत मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने एसटी प्रशासनाला एक निवेदन देखील दिलेले आहे. त्यामुळे प्रवाशांनी देखील सतर्क राहून प्रवास करताना आपणाला कसा फायदा मिळेल, याची दक्षता घेतली पाहिजे.

 

माई च्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले की, ‘आज सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५८५ बस स्थानकातील १५ हजार ५१२ बसेस दररोज राज्यभरात धावत असतात. या बसेस मधून महिला, पुरुष व लहान मुले असे एकूण ८.७ मिलियन (८७लाख) प्रवाशी यात्रा करतात. महामंडळास या पोटी दररोज जवळपास २४ कोटींचे उत्पन्न प्राप्त होते.

सदरच्या १५ हजार ५१२ बसेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत असतानां रस्त्यावर ढाबे, हॉटेल व मॉल आदी ठिकाणी नाश्ता व जेवणासाठी बसेस हमखास थांबतात. अशा सर्व थांब्यावर मालक, व्यवस्थापनाकडून प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. मनमानी दर आकारले जातात.विचारपूस केल्यास उद्धट उत्तरे मिळतात. अनेक ग्रामीण प्रवाशी आपल्या सोबत एक वेळेचे जेवण आणतात ते जेवण करण्यासाठी हाँटेलमध्ये जेव्हा जातात तेंव्हा काही हाँटेलमध्ये घरच्या जेवणास मनाई केली जाते. किंबहूना हाँटेलमध्ये ठळक अक्षरात लिहिलेले असते ‘येथे बाहेरचे अन्न पदार्थ आणण्यास व खाण्यास सक्त मनाई आहे’ प्रथमतः ही अट रद्द करण्यास भाग पाडावे.

ज्या, ज्या थांब्यावर बस थांबतील मग ते हॉटेल असो, मॉल असो किंवा ढाबे असो तेथे गेल्यावर प्रवाशांनी आपले बस तिकीट हॉटेल व्यवस्थापनास दाखवल्यास त्यांना केवळ ३० रुपयांत नाश्ता द्यायला हवा. मात्र असे कुठंही होतांना दिसत नाही. माईचे मुंबई चे संघटन सचिव चिटणीस यांनी सूचित केले की, “प्रवाशांचा विचार करून परिवहन मंडळाने, तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना तसे आदेशाचे पत्र पाठवून ‘बस प्रवाशांना केवळ ३० रुपयांत नाश्ता मिळेल ‘असे स्टिकर प्रत्येक बस व हॉटेल, मॉल व ढाब्यावर दर्शनी भागात चिटकवून प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी, अन्यथा आम्हांला पर्यायी मार्ग अवलंबावा लागेल.”

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.