पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
विजय बकरे/ कोल्हापूर
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्न गांभिर्याने घ्या. त्यांच्या मांगण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, या व अन्य विविध मांगण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक शेतकरी गुरुवारी थेट काेल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. किसान संघाचे प्रांत सदस्य आर. डी. चौगले, जिल्हाध्यक्ष ॲड. यशवंत खानविलकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे फलक हातात घेउन ताराबाई पार्क येथून भव्य मोर्चा दाखल झाला., गडहिंग्लज, कागल, चंदगड, आजरा तालुक्यातील चारशेहून अधिक शेतकरी आक्रमक होऊन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले. मात्र, पोलीस प्रशासनाने त्यांचा मोर्चा प्रवेशद्वाराजवळ अडवण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करत सर्व आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. या मोर्चाला आर. डी. चौगुले व ॲड. यशवंत खानविलकर यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात कागल तालुक्यातील धनाजी खराडे, जावेद देसाई, आर. डी. पाटील, प्रकाश पाटील, अमित लुगडे, चंद्रकांत तहसिलदार, पांडू पानसरे, करवीर तालुक्यातील राजेश पाटील, देव पाटील, लक्ष्मण पाटील, सरदार निरुखे, अभिजित पाटील, तानाजी पाटील, मधुकर पाटील, सुनील पाटील, बाजीराव पाटील, तानाजी चौगुले येथील शेतकरी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी निवेदन स्विकारले.
कोल्हापूरच्या प्रश्नांकडे आकर्षक फलकाद्वारे वेधले लक्ष गलगले येथील कागल तालुक्यातील चिकोत्रा प्रकल्पांतर्गत अन्यायी ठरलेली चार एकर स्लॅबची मर्यादा तातडीने बदलून ती पुन्हा ८ एकर करावी, चिकोत्रासाठी राखीव जमीन अशी सातबारावरील शेरा रद्द करावी. प्रस्तावित एनएच १६६ महामार्गामधील भूसंपादनात मौजे भुये, भुयेवाडी, किणी येथील शेतकऱ्यांच्या बाधित पाईपलाईनचा तसेच नुकसान होत असलेल्या घरे, झाडे, विहिरींचे फेरसर्वेक्षण करावे. या व अशा अनेक मागण्या तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.