✍️ Positive Watch विशेष संपादकीय एकदा पुण्यात एका चहाच्या टपरीवर बोलताना एका मध्यमवयीन माणसाने सहज म्हटलं, सगळेजण गप्प झाले. त्या वाक्याने शांतता पसरली. पण मनात वादळ उठलं. खरंच… मागे पडलो का आपण? की अजूनही जुन्या सवयींमध्ये, जुन्या विचारांमध्ये, जुन्याच साच्यात जगतोय? आज मराठी समाजात हुशारी आहे, विचार आहे, शिकलेले लोक आहेत, कदाचित कारणं साधी आहेत — पण परिणाम खोलवर आहेत. प्रवास म्हणजे खर्च, शिक्षण म्हणजे फक्त डिग्री, काम म्हणजे नोकरी आणि व्यवसाय म्हणजे धोका. कोणीतरी उद्योग करायला लागला की घरातच शंका घेतली जाते. आणि दुसऱ्याच यशात ‘संदेह’ शोधायला आपल्याला वेळ लागत नाही. इतका वेळ आपण राजकारण, जात, गुंतलेली नाती, आणि “दुसऱ्याचं मला काय?” या भावनेत अडकलेलो असतो. घरात एकच कमावणारा. बहीण शिकवायची, वडील आजारी, स्वतःची पदवी अर्धवट — दुसऱ्याचं नुकसान झालं की ‘मी सांगितलं होतं त्याला नको करायला’ म्हणायला तयार, एखादं मूल “नाही रे, मला ऑफिस नको, माझा काहीतरी उद्योग करायचाय” असं म्हणालं, आपल्याकडे कल्पना आहेत, पण पाठिंबा नाही. आणि हो — इंग्रजी अजूनही आपल्याला घाबरवतं. मराठी माणूस चाणाक्ष आहे, शहाणा आहे, आणि जबाबदारी घेणारा आहे — कदाचित आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला विसरलो आहोत. स्वतःचा वेळ आपण राजकारणात, लग्नसोहळ्यांत, भूतकाळाच्या गौरवात, आणि “लवकरच काहीतरी करीन” या विचारात घालवतो. आणि मग आपण म्हणतो, “आपण मागे आहोत.” पण खरंतर आपण मागे नाही. आजही वेळ गेलेली नाही. कारण इतिहास फक्त शिवाजी महाराजांनी घडवलेला नाही… |