पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
देशप्रेम जागविणारी एकापेक्षा एक सरस गाणी, जोडीला भरत नाट्यमसह लावणी, पारंपारिक गोंधळ, कोळी नृत्य, शिवकालीन मर्दानी खेळ, तलवारबाजींच्या प्रात्यक्षिकांसह,भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च रेलचेल करत, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांची मनं जिंकत, दहा दिवस सुरु असलेल्या शिवाजी ट्रेल ट्रेकची यादगार सांगता केली.यावेळी सांगता समारोपला अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहूल रेखावर, प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विक्रांतसिंह कदम, ब्रिगेडीयर अभिजीत वाळिंबे, कर्नल संधान मिश्रा, कर्नल अजय थोरात,कर्नल सुहास काळे, अपूर्वा शेलार यांच्यासह ग्रुप कमांडर एनसीसी कोल्हापूर उपस्थित होते.
दहा दिवसाच्या पन्हाळा ते विशाळगड ट्रेकमधील अंगावर शहारे आणणारे अनुभव होते. एक नवा थ्रिल जाणवला. छत्रपती शिवाजी महाराज यांची झालेली सुटका आणि पन्हाळा ते विशाळगड दरम्यान, पावनखिंड येथे झालेली लढाई, शिवाजी महाराज यांच्या काळातील रणनिती, गनिमा कावा कसा होता हे प्रसंग ऐकताना, अनुभवताना अंगावर शहारे येत होते. तसेच येथील निसर्ग, डोंगरदऱ्या, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, जैववैवधता पाहता आल्याच्या प्रतिक्रीया कार्यक्रमाच्या निमित्तांने एनसीसीच्या विविध मुलींनी दिल्या. यावेळी पन्हाळा ते विशाळगड सारखाचा अनुभव महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांचा पुढील काळात ट्रेनिंगच्या दरम्यान, मिळावा. येथील लोकांचा स्वभाव,ग्रामीण संस्कृती, राहणीमान कसे आहे याचाही सुखद आनंद मिळाल्याचे विविध राज्यातील सहभागी एनसीसीच्या कँडेटसनी संवाद साधताना सांगितले.
एक उत्तम नागरिक बना.. यशस्वी जीवनाचा हाच पाया– राहूल रेखावार
अध्यक्षस्थानावरून एनसीसीच्या कँडेटसना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले की, एनसीसी प्रशिक्षण हा हा एक चांगला नागरिक बनण्याचा व भविष्यातील यशस्वी जीवन जगण्याचा पाया आहे. शिवाजी ट्रेलट्रेक सारखे उपक्रम जीवन जगण्याचे महत्वाचे धडे देतात. जे कँडेटससाठी नेहमीच उपयुक्त ठरतील. भविष्यात निश्चितच उत्तम नागरिक, उत्तम अधिकारी बनला असाही विश्वास रेखावार यांनी व्यक्त केला.
संपूर्ण ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ब्रिगेडीयर अभिजीत वाळिंबे यांनी सर्व गर्ल कँडीडेटसचे अभिनंदन करत, संपूर्ण ट्रेल ट्रेकचे नियोजन करणारे अधिकारी, कर्मचारी, व्यवस्थापण-प्रशासन यांचेही त्यांनी आभार मानले. सानिका अकनुरकर व अमृता जाधव यांनी सुंदर आवाजात शब्दबद्ध केलेलं सूत्रसंचालन देखिल कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. परराज्यातील एनसीसी कँडेटसनी आपल्या सांस्कृतिक तसेच मर्दानी कार्यक्रमांचा प्रथमच मनसोक्त आनंद लुटताना टाळ्या वाजवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.