POSITIVE WATCH – नवरात्र उत्सव म्हणजेच नवचैतन्य… नवरात्र विशेष…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मॉं देवी हे मांगल्य, चैतन्य, उर्जेचे व शक्तीचे प्रतीक आहे.

अनेक कठीण प्रसंगी देवीची आराधना केली जाते. कारण मॉं दुर्गेचे दुसरे रूप म्हणजे संपूर्ण ब्रम्हांडच म्हणावे लागेल. घटस्थापणेपासुन तर दसऱ्यापर्यंत संपूर्ण भारतात आपल्याला वेगवेगळ्या पध्दतीचे उत्सहाचे व मांगल्याचे वातावरण पहायला मिळते. मॉं दुर्गाची शक्ती अफाट व अनंतकाल आहे. त्याची आपण गणना सुध्दा करू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण शुभ कार्याप्रसंगी व कठीण प्रसंगी देवीची आराधना केली जाते. देवीचे अनेक रूप आपल्याला पहायला मिळते. प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूपच महत्व दिले गेले आहे. शक्तीची उपासना मानवजातीच्या कल्याणासाठी नेहमी प्रेरणादायी ठरत असते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला वेगवेगळी शक्तीची रूपे पहायला मिळते. म्हणजे नवरात्रीमध्ये पृथ्वीतलावर साक्षात देवी प्रगट होत असते. या पृथ्वीतलावर देवी भागवत पुराणानुसार देवींची १०८ शक्तीपीठ असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पुराणांमध्ये ही आकडेवारी वेगवेगळी सांगीतली आहे.

कालिका पुराणांमध्ये  २६ , शिवचरित्र पुराणामध्ये ५१,दुर्गा शप्तसती आणि तंत्रचूडामणिमध्ये शक्ती पीठांची संख्या ५२ सांगितली आहे. परंतु साधारणत: ५२ शक्तीपीठांना जास्त महत्व दिले जाते. या शक्ती पीठांपैकी साडेतीन शक्तिपीठे एकट्या महाराष्ट्रात आहे हे महाराष्ट्राचे अहोभाग्यच म्हणावे लागेल. देवीची साडेतीन शक्तिपीठामध्ये श्री महालक्ष्मी(अंबाबाईचे मंदिर,कोल्हापूर) हे महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. श्री रेणुकामाता (माहूर) माहूर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी दुसरे असून येथील पीठाची देवता रेणुकामाता आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर पहायला मिळते. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ आहे. तुळजाभवानी (तुळजापूर) महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तिसरे शक्तीपीठ आहे. श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिध्द आहे.

महाराष्ट्रातील प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य दैवत अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर यादवकालीन मानले जाते. तर काहिंच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मानली जाते. व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगी देवी (नाशिक) सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकार रूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिशासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्यांद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत.त्यावरूनच या स्थानाचे नाव सप्तशृंगगड असे पडले. नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण भारतात आपल्याला एक वेगळेच मांगल्याचे व नवचैतन्याचे वातावरण पहायला मिळते. कारण लहान-मोठे, आबालवृद्ध संपूर्ण मॉदेवीच्या आराधनेमध्ये तल्लीन असतात व जय माता दी चा जयघोष करीत असतात. त्यामुळे नवरात्रीपासुनच दिवाळीच्या सणाची चाहूल लागते आणि नवरात्रीपासुनच आपण घरांच्या सजावटीला सुरूवात करतो. नवरात्र उत्सवामध्ये देवीची ९ दिवस आराधना केल्यानंतर दशमीला विजयादशमी (दसरा) उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

या दिवसाचे महत्त्व म्हणजे असुरी शक्तीचा नाश व सत्याचा विजय मानलेल्या जाते. दशमीला प्रभुरामचंद्राने रावणाचा संहार करून असुरी शक्तीला संपवीले व विजय प्राप्त केली. त्यानिमित्यानेच विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. आपण पहातो की नवरात्रीपासुन गुलाबी थंडीला सुरुवात होते. म्हणजे संपूर्ण सृष्टीचे वातावरण या ९ दिवसांमध्ये बदलल्याचे आपल्याला दिसून येते व सर्वत्र नवचैतन्य निर्माण होते. महाराष्ट्राला संतांची भूमी संबोधल्या जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अनेक देवीदेवतांचे वास्तव्य असल्याचे आपल्याला पहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण नागरिकांनी महाराष्ट्र दर्शन करून देवीदेवतांचे एकदा तरी दर्शन घेतले पाहिजे. नवरात्रामध्ये आपण मॉदेवीची आराधना करतोच यात दुमत नाही. परंतु निसर्गाला वाचविण्यासाठी देवीला साकडे सुध्दा घातले पाहिजे. कारण दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन डगमगल्याने हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. यामुळे पशुपक्षी,मानव, जीवजंतू यांचा जीव धोकादायक स्थितीमध्ये आल्याचे स्पष्ट दिसुन येते. कारण वाढते प्रदुषण, जंगल तोड यामुळे निसर्ग भयभीत झालेला आहे. याचेच प्रयचित्य पशुपक्षांना भोगावे लागत आहे. आज जंगल तोडीमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक पशुपक्षी नामशेष झाल्याचे दिसून येते. उदाहरण द्यायचे झाले तर चित्ता असे अनेक पशुपक्षी आहेत की ते काही नामशेष झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. याकरिता नवरात्र उत्सव लक्षात घेता संपूर्ण भक्तांनी वृक्षलागवडीकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. फक्त फोटो शेषन पुरते वृक्षारोपण नसावे तर ९ दिवस वृक्षलागवडीची मोहीम युध्दपातळीवर राबवीली पाहिजे.

यात सरकारचा, प्रशासनाचा, सामाजिक संस्थांचा सुध्दा सहभाग असायला हवा. यामुळे निसर्ग प्रफुल्लित होईलच मॉदेवी सुध्दा प्रसन्न होईल व आपणा सर्वांना भरपूर आर्शिवाद देईल. कारण वृक्षलागवडीमुळे स्थल, जल, वायु यांचे संतुलन स्थिर रहाण्यास मोठी मदत होईल. मॉ महालक्ष्मी, रेणुकामाता, तुळजाभवानी, सप्तशृंगी देवीला प्रार्थणा करतो की नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होवो आकार-पाताळ, पुर्व-पश्चिम, उत्तर -दक्षिण सर्वत्र सुख-शांती व मांगल्याचे वातावरण निर्माण झाले पाहिजे अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. कारण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होने काळाची गरज आहे. कारण वाढते प्रदुषण, जंगलतोड व दिवसेंदिवस ऑक्सिजनची मात्रा कमी होने यामुळे मानव, पशुपक्षी, जीवजंतू व अन्य प्राणी यांचा सर्वांचा जीव धोक्यात आहे. याकरीता नवरात्र उत्सवाच्या पावनपर्वाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संपूर्ण भारतवासीयांनी इतिहास घडवीने गरजेचे आहे. कारण मॉ देवी म्हणजे संपूर्ण ब्रम्हांड त्यामुळे आपल्याला वृक्षांच्या जळामुळात, पानात, फुलात, फळात आपल्याला देवीचे अवश्य दर्शन अवश्य होईल.                                                         सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके!!                   शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते!!                             !! जय माता दी!!       

लेखक  रमेश कृष्णराव लांजेवार  माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.