नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता – धनंजय मुंडे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच…

नागपूर – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थ साहाय्यीत अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या द्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे नियोजन शासन करत असताना या योजनेचा गैरफायदा घेऊन कोणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर शंभर टक्के कार्यवाही करून चुकीचे अनुदान लाटलेल्यांकडून सक्त वसुली करण्यात येईल, अशी ग्वाही आज विधान परिषदेत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत औजारे व ट्रॅक्टर वाटपाच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ. अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती, त्याच्या उत्तरादाखल मुंडे बोलत होते. अकोला जिल्ह्यात सदर योजनेतून ट्रॅक्टर व औजारे खरेदीच्या अनुदाना संदर्भात ज्या तक्रारी आल्या आहेत, त्याचा तपास सखोल पद्धतीने करण्यात येत असून, यातील दोषींवर सक्त वसुलीसह आवश्यकता भासल्यास पोलीस तक्रार देखील करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास आता योजनेचे स्वरूप देण्यात येणार असून, आजवर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली येण्यास तसेच समूह शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यास ही योजना मार्गदर्शक ठरली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा लवकरच कार्यान्वित करणार येणार असल्याची माहिती, उपस्थित लक्षवेधीच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.