विनायक जितकर
शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत तालुका निहाय अपंग बांधवांना देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करा…
राधानगरी प्रतिनिधी – राज्यातील नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, नागरिकांसाठी विविध कागदपत्रे सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादेत मिळावीत. आणि त्यांचा यासाठी होणारा अनावश्यक खर्च वाचावा, यासाठी राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी योजनेची सुरवात करण्यात आली असून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील अपंग बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुका निहाय कॅम्प आयोजित करून शासकीय योजनांचा लाभ द्या असे निर्देश आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. ते पंचायत समिती, राधानगरी येथे अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीमध्ये बोलत होते.
![]() |
![]() |
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यामध्ये अपंग बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अपंगांकरीता राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू आहेत. या योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी विलंब होत असून त्यांना योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे अपंग बांधव योजनांपासून वंचित राहून असून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील अपंग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत तालुका निहाय कॅम्पचे आयोजन करुन अपंग बांधवांना UDID कार्ड, अपंग साहित्य व इतर योजनांचा लाभ द्यावा अशा सुचना यावेळी त्यांनी केल्या.
यावेळी आढावा बैठकीस गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, माजी उपसभापती अरुणराव जाधव, तहसीलदार मिना निंबाळकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, उपअभियंता सुरेश खैरे, राजेंद्र शेट्टी, दत्तात्रय सावंत, राजेंद्र वाडेकर, विश्वास राऊत, विलास डवर, फारूख नावळेकर, यांच्यासह कर्मचारी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.