“काॅ. मदननाना और काॅ. किशोरजी का अधूरा काम कौन करेगा, हम करेंगे हम करेंगे!”…
शिरपुर (प्रतिनिधी) – दिवंगत काम्रेड ॲड.मदन परदेशी व डाॅ.किशोर सुर्यवंशी यांना कृतज्ञतापूर्वक श्रध्दांजली अर्पित करण्यासाठी तालुक्यातील हिसाळे गांवात मंगळवार 12 मार्च रोजी निर्धार सभा हजारों साथींच्या साक्षीने भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या निर्धार सभेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डाॅ. काॅ. भालचंद्र कानगो, राज्य सचिव काॅम्रेड सुभाष लांडे,सहसचिव काॅम्रेड प्रा. राम बाहेती, प्रा. राजु देसले हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.या सभेसाठी धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्य़ातील विविध संघटनेचे पदाधिकारी, हिसाळे गांवाचे आजी माजी सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, आशा व गटप्रर्वतक भगिनी, आदिवासी महिला व शिरपूर तालुक्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि हिसाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काॅम्रेड अर्जुनदादा कोळी हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
निर्धार सभेच्या सुरुवातीलाच प्रमुख मान्यवर आणि उपस्थित सर्वांनी दिवंगत काम्रेड ॲड.मदन परदेशी व डाॅ.किशोर सुर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून विनम्र अभिवादन केले. तदनंतर उपस्थित सर्वांनी दिवंगत काम्रेड ॲड. मदन परदेशी व डाॅ.किशोर सुर्यवंशी, कै.रेहमान टिटाण्या पावरा, वीज कर्मचारी संघटनेचे नेते व दलितमित्र कालकथित एम. जी. धिवरे जिभाऊ, कै. प्रा. रंजीतजी परदेशी, कै.श्रीमती शांताबाई के. मारवाडी व गतकाळात दिवंगत सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहिली. यानंतर प्रास्ताविक करताना भारतीय किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष ॲड. काॅ. हिरालाल परदेशी यांनी दिवंगत दोन्ही नेत्यांच्या संघर्षमय जीवनाचे वर्णन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अन्यायाविरुद्ध लढा देताना जीवाची ही पर्वा न करता शेवटपर्यंत आपल्या तत्वांशी व विचारधारेशी एकनिष्ठ राहून साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार केला होता असा गर्वाने उल्लेख केला. आपल्या प्रास्ताविकात भावना व्यक्त करतांना काम्रेड हिरालाल परदेशी यांना गहिवरून आले व उपस्थित जनसमुदाय सुध्दा भावविव्हळ झाला होता. या शोकसभेत स्व.काम्रेड ॲड.मदननाना परदेशी व डॉ. किशोर सूर्यवंशी यांच्या धर्मपत्नी सुध्दा हजर होत्या.
सभेचे प्रमुख वक्ते सर्वश्री माजी जिल्हा परिषद सदस्य ओंकार आबा जाधव, दैनिक भास्कर चे जिल्हा ब्यूरो चीफ गोपाल के.मारवाडी, धुळे जिल्हा भाकपचे नेते साथी काम्रेड वसंतजी पाटील, चोपड़ा येथील अमृतराव महाजन,तरडीचे ॲड.संतोषजी पाटील, उखा रामदास पाटील, यांनी आपल्या भावपूर्ण शब्दांत ॲड.मदन परदेशी व डाॅ.किशोर सुर्यवंशी यांच्या आदर्शवत जीवनाचा वारसा परदेशी व सूर्यवंशी कुटुंबीय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पुढे अविरतपणे सुरु राहील अशी आशा व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.स्व.ॲड.मदननाना यांच्या कर्मभूमि हिसाळे गांवात मुद्दाम ह्या निधर/शोक सभेचे आयोजन करण्यात आल्याचे अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला प्रमुख पाहुणे भाकप राज्य सरचिटणीस श्री सुभाषजी लांडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, दिवंगत दोन्ही आमचे आदरणीय परममित्र होते.तसेच आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेले दोन्ही दिग्गज नेते, उच्चशिक्षित कायदेतज्ज्ञ व डॉक्टर होते. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली असून ती भरले जाणे अशक्य जरी असले तरी आम्ही सर्व जण मिळून त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहू,हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले.
शेतकरी शेतमजूर संघटनेचे राज्य सहसचिव प्रा.राम बाहेती यांनी दिवंगत दोन्ही नेते ॲड.मदन परदेशी व डाॅ.किशोर सुर्यवंशी हे तत्वनिष्ठ, जुझारू आणि सर्वहारा वर्गाला सदैव हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते.”जेका रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा”असे वर्णन केले. भावपूर्ण अश्या शब्दांत भाकपचे राज्य सहसचिव नाशिकचे प्रा.राजू देसले यांनी अहिराणी भाषेत दोन्ही कर्तृत्ववान नेत्यांच्या थोड्या अंतराच्या कालावधीने जाण्याने पक्ष आणि संघटनेची अतोनात हानि झाल्याची खंत व्यक्त केली आणि त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यास ॲड. काॅ. हिरालाल परदेशी, वसंत पाटील संतोष पाटील यांचेसह सर्व साथी मिळून नानासाहेबांचे व डॉ. सूर्यवंशी सरांचे काम अखंडपणे सुरू ठेवू असा निर्धार व्यक्त केला. सभेत अनेकवेळा उपस्थितांनी “काॅ. मदननाना और काॅ.किशोरजी का अधूरा काम कौन करेगा,हम करेंगे हम करेंगे!” अश्या ज़ोरदार घोषणा दिल्या. निर्धार सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ.भालचंद्रजी कांगो यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, डॉ किशोर सूर्यवंशी आणिॲड.मदननाना परदेशी हे चालते बोलते न्यायालय होते. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातंच नव्हता. वास्तविक अजून अनेक वर्षे त्यांनी जगले पाहिजे होते. म्हणजे आमच्या सारख्या साथींना खूप काही शिकायला मिळाले असते.तरीही त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमच्या पक्ष व संघटनेला सोबत घेऊन वाटचाल सुरू ठेवायची आहे.”जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती” असे आमचे दोन्ही साथी काम्रेड यांचे कार्य होते. शेवटी सभेचे अध्यक्ष श्री अर्जुनदादा कोळी यांनी सुध्दा आपल्या जिगरबाज साथींच्या बाबतीत कृतज्ञ भावना व्यक्त करुन आता आपली जबाबदारी वाढली आहे असे सांगितले.सदरील निर्धार सभा दुपारी चार वाजता सुरू झाली.आणि संध्याकाळी उशीरापर्यंत सुमारे अडीच तासांपेक्षाही अधिक वेळ सुरु होती.
या निर्धार सभेसाठी काॅ.ईश्वर पाटील भाकप जिल्हा सचिव, वीज कर्मचारी संघटनेचे नेते काॅ. नाना पाटील दोंडाईचा, शिवाजीराव पाटील शिरपूर,जितेंद्र देवरे भा.क.पक्ष शहर सचिव,नाना सो विजयसिंह राजपुत, भा.क.पक्ष नेते,बुधा मला पावरा, शिलदार पावरा चिंचपाणी,सतिलाल पावरा धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष,तालुकाध्यक्ष नारसिंग पावरा पनाखेड,हरचंद पावरा खंबाळे,योगेश पावरा,रामदास पावरा,जाड्या पावरा, कावा पावरा खैरखुटी ,आपसिंग पावरा,चतरसिंग पावरा,भरत सोनार बोराडी, स्मिता दोरीक कार्याध्यक्ष आशा व गटप्रर्वतक संघटना शिरपूर, देवेश दोरीक भामपुर, आक्का पावरा गटप्रर्वतक सुळे व आशा कार्यकर्ता देखील मोठ्या संख्येने हजर होत्या.या निर्धार सभेसाठी तुळशीराम पाटील, कैलास पाटील, बन्सीलाल कोळी, अँड. सचिन थोरात, अँड.कवरलाल कोळी, कमलाकर पाटील, अशोक गोसावी शांतीलाल परदेशी, रामसिंग परदेशी, मनोज पाटील, हेमराज पाटील यांनी खूप परीश्रम घेतले. सभेचे सूत्रसंचालन निंबाभाऊ शिंपी यांनी केले. उपस्थित सर्व वक्त्यांनी आपले श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त करतांना स्व. ॲड. मदननाना परदेशी व डॉ किशोर सूर्यवंशी यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या प्रति आपली भावना व्यक्त करून भारतीय किसान सभा, भाकप केंद्रीय समिती, भाकप राज्य समिती, शेतकरी शेतमजूर संघटना, अंगणवाडी सेविका,आशा व गटप्रवर्तक कार्यकर्ते, किसान विकास फाउंडेशन, भारतीय समाज संघ, भारतीय पत्रकार संघ, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, सावकार पीडित संघटना, धुळे जिल्हा जागृत जनमंच,दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बचाव समिती सह विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी लाल सलाम करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.