कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त सरकारकडे मागणी
कोल्हापूर – पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर अत्यंत भीषण हल्ला करून 1400 हून अधिक लोकांची निर्घृण हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान-कोवळ्या मुलांचाही शिरच्छेद केला. अशा राक्षसी ‘हमास’ला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि ‘हमास’, तसेच तिला पोसणार्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणार्यांवर आणि आंदोलने करणार्यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 19 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे करण्यात आली.
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई आणि शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, हिंदु युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अशोक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे आणि साधना गोडसे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष आनंदराव पवळ, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे शरद माळी, उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख . उदय भोसले, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप आणि . संजय कुलकर्णी, शिवसेनेचे अर्जुन आंबी, भाजप युवामोर्चाचे अमेय भालकर, शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी . नितीन चव्हाण, बजरंग दलाचे प्रथमेश मोरे, हिंदू एकता आंदोलनाचे अमर जाधव, वैभव कवडे, विश्व हिंदु परिषदचे विजय पाटील, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिपेकरवाडी येथील धर्मप्रेमी विकास भाटे यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन धर्मप्रेमी रामभाऊ मेथे यांनी केले.
‘हमास’च्या समर्थनार्थ लेबनॉनची ‘हिजबुल्लाह’ ही आतंकवादी संघटना, तसेच येमेनमधील ‘हूती’ ही आतंकवादी संघटना इस्रायलविरोधात सशस्र लढा देत आहे. आतंकवाद्यांना आतंकवादी संघटनाच साहाय्य करणार, त्याप्रमाणे हे आहे. जर उद्या अशा आतंकवाद्यांनी भारतात आतंकवादी आक्रमणे केली, तर आज ‘हमास’ला समर्थन करणारे त्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थही रस्त्यावर उतरतील. काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर अशाप्रकारे आक्रमणे झाल्याचा देशासमोर आहे. त्यामुळे ‘हमास’ला समर्थन करणारे हे येणार्या काळात देशातील अंतर्गत संघर्षाला कारणीभूत ठरतील आणि देश गृहयुद्धाच्या दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आतंकवाद्यांच्या समर्थकांना वेळीच पायबंद घालायला हवा. ‘हमास’प्रती लोकशाही मानणार्या कोणत्याही नागरिकाच्या मनात सहानुभूती कशी काय असू शकते ? त्यामुळे केंद्र शासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी आंदोलनाच्या माध्यमांतून करण्यात आली.
|