विनायक जितकर
राधानगरी तालुक्यात 2 ऑक्टोंबर पासून शासन आपल्या दारी कार्यक्रमाची सुरवात…
राधानगरी प्रतिनिधी – राधानगरी तालुक्यात 2 ऑक्टोंबर पासून शासन आपल्या दारी कार्यक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे या कार्यक्रमात सर्व शासकीय योजना राबवणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ते पंचायत समिती राधानगरी येथे शासकीय योजनांच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीमध्ये बोलत होते.
![]() |
![]() |
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाच्या सर्व घरकुल योजनांच्या माध्यमातून ज्या बांधवांना अद्याप घरकुल मिळालेले नाहीत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे मिळणेसाठी प्रस्ताव तयार करावेत. रामाई आवास योजनेमध्ये पुर्वी घरदुरूस्तीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत होते. ही बाब मा. मुख्यमंत्री महोदय व सचिव, सामाजिक न्याय यांचे निदर्शनास आनून दिल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही अट आकारण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत त्यामुळे अशी कोणतीही अट घालता येणार नाही. या सर्व योजनांच्या माध्यमातून घरकुल मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच सर्व शासकीय विभागातील योजना 2 ऑक्टोंबरला समंधित लाभार्थी पर्यंत लाभ मिळवून द्यावा याबाबतची कार्यवाही तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे करावे असे सुचना केल्या.
शेतातील दैनंदिन कामकाज करत असताना शेतकऱ्याला पाणंद रस्यांसेचा उपयोग करावा लागतो परंतू सदरील रस्ते हे नादरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असून पालकमंत्री व मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून पाणंदी अधिक चांगल्या करण्यासाठी सामुदायीक प्रयत्न करणे गरजेचे असून 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या पाणंदीच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात करण्याच्या सुचना केल्या. तसेच अपंग बांधवांना UDID कार्ड व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. यासह अन्न सुरक्षेचे लाभार्थी निवड करावी जेणेकरून कोणतेही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले. तसेच वैयक्तिक लाभाचे प्रामुख्याने गोठा प्रकरणे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते ते वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत ही बाब गंभीर असून याकरीता सदरची यंत्रणा सक्षम करण्याकरीता आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे तसेच प्रस्ताव प्रलंबित आहेत ते तपासणी करून मार्गी लावावे अशा सुचना केल्या.
जलजीवन मिशन कामाबाबत तालुक्यात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने गंभीर स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधीत सर्वेक्षण करणारी कंपनी, ठेकेदार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची संयुक्तपणे बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. तसेच ज्यागावामध्ये पुर्व परवानगी न घेता गावांतर्गत रस्ते खुदाई केली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना केल्या.
यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर, महसूल नायब तहसीलदार ऋतुराज निकम, तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांच्यासह राधानगरी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.