मजरे कासारवाडा येथील शेतकऱ्यांनी केला हुंगणी मुक्त गाव करण्याचा निर्धार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

आत्मा, कृषी विभाग, कृषी महाविद्यालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोहीम यशस्वी…

बिद्री – शेतकऱ्यांनी निर्धार केला. नि एका रात्री ताे साध्य करत तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी देखील केला आहे. राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील तब्बल ४० शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्रित येत आपला गाव हुंगणीमुक्त करण्याचा संकल्प केला नव्हे तर ताे सत्यात देखील उतरविला आहे. याला गावचे सरपंच युवराज वारके व ग्रामपंचायत सदस्य यांची मोलाची साथ लाभली.

आत्मा, कृषी विभाग व कृषी महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या या उपक्रमाला जिल्हा कृषी अधिकारी भिंगारदिवे यांनी भेट दिली. शेतकरी व ग्रामस्थांनी दिलेली बहुमूल्य साथ ही निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट, नवी दिशी देणारी असून, याचा आदर्श सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवहान भिंगारदिवे यांनी केले. या यशस्वी प्रयाेगानंतर गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण हाेते. मजरे कासारवाडचा हा संकल्पपूर्तीचा प्रकल्प म्हणजे एक बँडअँम्बेसिडर म्हणूनच पुढे येईल असे जिल्हा कृषी अधिकारी अरूण भिंगारदिवे म्हणाले.

VIDEO पाहण्यासाठी ब्लु लिंक क्लीक करा

https://youtu.be/wkadn0UsxAs?si=D0Aztj3RoQfRpSPY

या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया… जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल, याचे अनुकरण करता येईल. सुरवातीला आत्मा, कृषी विभाग, कृषीविद्यालय व ग्रामपंचायत यांच्या वतीने गावामध्ये डॉ. अभय कुमार बागडे व कॉलेज चे २० विद्यार्थी यांच्या माध्यमातून गावात प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर मेटारायझम कामगंध सापळे यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यानंतर वळीवाचा पाहिला पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी 5 ते 7 या वेळेत कामगंध सापळे शेतामध्ये लावले. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना प्रत्येक सापळ्या मध्ये 100 पासून 300 पर्यंत हुंगणीचे भोंगे सापडले. यामुळे लोकांच्या मध्ये जागृती निर्माण होऊन ग्रामपंचायतीने हुंगणी निर्मूलनाची मोहीम हाती घेऊन गावामधील सर्व शेतकऱ्यांना आवहान करून सर्व शेतकऱ्यांना या मोहिमेत सहभाग घेण्यास भाग पाडले व ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये नदीकाठाला तिटवे ते तुरंबे हद्दी दरम्यान 40 खड्डे कडून शेतकऱ्यांना प्रकाश सापळ्यासाठी लागणारे साहित्य देऊन सापळे लावण्यात आले. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा व अनुभव मिळाला. पुढील काळात गावातील प्रत्येक शेतकरी यामध्ये सहभागी होऊन हुंगणी मुक्त गाव होईल. असे सरपंच युवराज वारके यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, कृषी पर्यवेक्षक दिलीप आद‌मापूरे, कृषी सहाय्यक अमोल कांबळे, प्रदीप गोगाने, जयदिप पाटील, युवराज सावंत, प्रकल्प व्यवस्थापक आत्मा सुनिल कांबळे, सरपंच युवराज वारके, तालुका कृषी आत्मा कमिटी सदस्य सचिन वारके, उपसरपंच अरुण वारके, ग्रामपंचायत सदस्य सुहास वारके, विक्रम वारके, मनोज खोत, सुनिल वारके, मानसिंग वारके, दिगंबर जितकर सुधीर वारके, सुनिल जितकर, अनिल वारके, यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.